केंद्राच्या निष्काळजीपणामुळेच पहलगाम हल्ला झाला, ममता बॅनर्जीं यांची मोदी सरकारवर टीका

केंद्राच्या निष्काळजीपणामुळेच पहलगाम हल्ला झाला, ममता बॅनर्जीं यांची मोदी सरकारवर टीका

पहलगाम दहशतवादी हल्ला केंद्राच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहे. भाजप आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचे राजकारण करण्यातही गुंतली आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केली आहे. आज बंगाल विधानसभेत ऑपरेशन सिंदूरसाठी सशस्त्र दलांचे कौतुक करणाऱ्या प्रस्तावावर बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

यावेळी परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आपल्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक कूटनीतिमध्ये काही अडचण आहे की, नाही हे मला माहित नाही. परंतु जागतिक स्तरावर पाकिस्तानला वेगळे करण्याऐवजी ते आयएमएफकडून कर्ज घेत आहे.”

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का उपस्थित नव्हते? भाजप सरकार आपल्या देशातील लोकांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे आणि म्हणूनच ते सत्तेबाहेर असले पाहिजे.” त्या म्हणाल्या की, “दहशतवादाला कोणताही धर्म, जात किंवा पंथ नसतो. आम्ही त्याचे समर्थन करत नाही.” पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान फक्त स्वतःचा प्रचार करण्यात गुंतले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचा सन्मान करणारा प्रस्ताव बंगाल विधानसभेत मांडण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प ‘क्या हुआ तेरा वादा’? शिवसेनेच्या चक्काजाम आंदोलनाने छत्रपती संभाजीनगर दणाणले, महावीर चौकात तासभर वाहतूक ठप्प
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची सत्ता मिळताच पूर्तता न करता जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या महायुतीला क्या हुआ तेरा वादा? असा खणखणीत सवाल...
14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट
‘चल हल्ला बोल’ नामदेव ढसाळांवरील चित्रपट फक्त प्रौढांसाठी! सेन्साॅर बोर्डाचा अजब निर्णय
No emotion, no love , no f××k! दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली अन् लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुयन्सरचा आज मृतदेह आढळला
…तर न्यायव्यवस्था हस्तक्षेप करणारच, मात्र अतिरेक टाळावा! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत