नारीशक्तीने घडवला चमत्कार; दुष्काळी भागाचा कायापालट, पुरेसा जलसाठा, शेतकरी सुखावला

नारीशक्तीने घडवला चमत्कार; दुष्काळी भागाचा कायापालट, पुरेसा जलसाठा, शेतकरी सुखावला

राजस्थानच्या करौली जिह्यातील महिलांनी आपल्या पुढाकाराने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्षानुवर्षे दुष्काळ असलेल्या या भागात नारी शक्तीच्या ध्यासामुळे कायापालट झाला. सुमारे 15 वर्षांपूर्वीपर्यंत येथील महिला घाबरत होत्या. सततच्या दुष्काळामुळे त्यांचे पती उदरनिर्वाहासाठी हिंसेच्या मार्गाला गेले. पर्जन्यमान कमी झाले आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे जमीन नापीक झाली होती. पाण्याचा साठा आटला होता. त्यामुळे शेती आणि पशुपालन व्यवसायावर मोठा परिणाम झाला. पाण्याच्या समस्येमुळे उद्भवत असलेल्या संकटावर मात करण्यासाठी संपत्ती देवी आणि त्यांच्यासारख्या अनेक महिला सरसावल्या. या संकटाला तोंड देण्याचे ठरविले व तिथूनच बदलाला सुरुवात झाली. दुष्काळामुळे अनेक पुरुष पैशांसाठी लुटमार, धमकावणे अशी कृत्ये करू लागले. ते पोलिसांच्या भीतीने जवळच्या जंगलात लपून बसत असत. महिलांनी आपल्या पतींना जंगलातून बाहेर येण्यास आणि शस्त्र खाली टाकण्यास प्रवृत्त केले.

उन्हाळ्यातही मुबलक पाणी

जंगल परिसरात आणखी 16 तलाव बांधल्याने उतारावरून वाहून जाणारे पाणी साठून राहते. पावसाळ्यात साठलेले पाणी दीर्घकाळ टिकते. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जलसंधारणामुळे नवीन शेतीच्या संधी निर्माण झाल्या. पाण्यामुळे या भागात स्थिरता आली असून पूर्वी पाण्याच्या अभावामुळे गुन्हेगारी वाढली होती. एकेकाळी करौलीचा भाग दरोडेखोरांसाठी ओळखला जायचा, पण आता उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते, असे करौलीचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश ज्योती उपाध्याय सांगतात.

शस्त्रे टाकली आणि शेतकरी बनला

महिलांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कोरड्या पडलेल्या तलावांचा विकास केला. नवीन जलसाठे बांधणे सुरू केले. दूध विकून कमावलेला पैसा एकत्र करून 2015-16 मध्ये एका गावाजवळ टेकडीच्या पायथ्याशी लहान डोह बांधण्यात आले. पाऊस आल्यानंतर हे डोह पाण्याने भरले आणि पहिल्यांदाच जास्त काळ पाणी टिकून राहिले. संपत्ती देवी यांचे पती जगदीश सांगतात की, मी आतापर्यंत मरण पावलो असतो, पण पत्नीने जंगलातून परत आणले. शस्त्रे टाकली आणि पुन्हा शेती करण्यास सुरुवात केली. आता आम्ही मोहरी, गहू, मोती बाजरी आणि भाज्या पिकवतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Monsoon Update :  जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? आयएमडीचा नवा अंदाज समोर IMD Monsoon Update : जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? आयएमडीचा नवा अंदाज समोर
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, यंदा तब्बल बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, दरम्यान जून महिन्यात देशभरात मान्सूनच्या...
IPL 2025 – जितेश शर्माच्या वादळात लखनऊचा धुव्वा; विराटनेही फोडून काढलं, RCB चा 6 विकेटने दणदणीत विजय
Video ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री सन्मान प्रदान
Photo – पांढऱ्या कॉर्डसेटमध्ये नुशरतच्या दिलखेच अदा
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान
Crime News – जीन्स घातली म्हणून मोठा भाऊ संतापला, लहान भावाचा गळा चिरला
चंद्रपूरमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू, तीन जण जखमी