या मंत्रिमंडळात अजित पवार हे सर्वात खुश, हे त्यांचं कौतुकास्पद कौशल्य – संजय राऊत

या मंत्रिमंडळात अजित पवार हे सर्वात खुश, हे त्यांचं कौतुकास्पद कौशल्य – संजय राऊत

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार खुश होते आणि आताही अजित पवार खुश आहेत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसेनेतही नाराज होते आणि आता फडणवीसांसोबतही नाराज आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुणीही फडणवीसांना भेटलं, मोदींना भेटलं याचा अर्थ कोणी नाराज आहे असे नाही. आमच्या सारखे कडवट शिवसैनिक अशा भेटी टाळतात. संशयास्पद वातावरण निर्माण होईल अशा भेटी टाळायच्या असतात. कुणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्यात काही चुकीचे नाही. इच्छा मरणाचा कायदा आहे, इच्छा मारण्याचा कायदा नाही. नाशिकमध्ये माध्यमात ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत तसे काही नाही. एखाद दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली याचा अर्थ संपूर्ण शिवसेनेना फाटाफूट आहे असे नाही. ती व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. त्या व्यक्तींना नाराजी व्यक्त करण्याएवढी प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलली असते. आज पक्ष अडचणीत आहे. लोकांना लाभ हवे आहेत, त्यासाठी ते पक्ष बदलत आहेत. कोणत्या महान विचारने पक्ष सोडला असेल तर मला सांगावं. आणि नाराजीचं म्हणाल तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेतही नाराज होते आणि आता फडणवीसांसोबतही नाराज आहेत. एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहा. या महाराष्ट्राच्या राजकारणात मला एकच व्यक्ती नाराज दिसत नाही ती म्हणजे अजित पवार. अजित पवार यांचं हे कौतुकास्पद कौशल्य आहे. मला अजित पवार कधीही नाराज दिसले नाहीत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्यांचा आरोप केला तरी ते नाराज नव्हते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते सर्वाधिक खुश होते. आता माणसांनी का नाराज व्हावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा राजकीय प्रश्न नाही. सगळे काही माझ्या मनाप्रमाणे व्हावे या भूमिकेत काही राजकीय लोक आणि काही कार्यकर्ते असतात. पण पक्ष हे संघटन असतं, पक्ष कुणाच्या मालकीचा नसतो. मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल. पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मताने चालायचं असतो. मी म्हणजे पक्ष नाही, या अहंकाराला सुरूवात होते तेव्हा त्या व्यक्तीच्या अधःपतनाला सुरूवात होते. शिंदे उद्धव ठाकरेंसोबत असतानाही नाराज होते आणि आता फडणवीसांसोबतही नाराज आहेत. अशा लोकांच्या आजारावर कोणताही उपाय नसतो.

तसेच काल दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची कोणतीही बैठक झाली नव्हती. इंडिया आघाडीची जर बैठक असेल तर तिथे उद्धव ठाकरे, शरद पवार अखिलेश यादव, लालू यादव, ममता बॅनर्जी असतील. विशेष अधिवेशना संदर्भात काल जो एक ड्राफ्ट तयार करायचा होता. त्यासंदर्भात आमची बैठक झाली. ही मागणी कशी पुढे नेता येईल त्या संदर्भात विचार विनिमय करणं अशी एक बैठक जी आहे ती वेगळ्या प्रकारची बैठक झाली. ती इंडिया आघाडीची बैठक नव्हती. इंडिया आघाडीची बैठक ही राहुल गांधी बोलवतील. काल तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आणि त्यातून आम्ही चार लोक बसलो.

तसेच स्वतः नरेंद्र मोदी या सगळ्या विषयाचे राजकारण करतायत. नरेंद्र मोदी काय म्हणतात, ब्रिगेडियरच्या किंवा आर्मीच्या वेषामध्ये प्रचार करतायत जो गुन्हा आहे, सैन्या बाहेरच्या व्यक्तीने सैनिकी वेषामध्ये वावरणं तो तो ड्रेस घालणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि हा कायदा यांनीच तयार केलेला आहे हे सगळे बेकायदेशीर काम करत असताना संसदेत चर्चा करायची की नाही ही भूमिका चुकीची आहे. जगभरामध्ये जे देश आम्हाला माहितच अशा देशांमध्ये आमचे लोक गेले आहेत. आता लवे लवेटिया नावाच्या देशाला स्वतःच सैन्य नाही तिकडे पोलीस नाहीयेत. तिकडे जाऊन आम्ही आमचे कर्तुत्वाचे पोवाडे गायचे. आधी चीन, म्यानमार, नेपाळ, अफगाणिस्तान सारख्या देशांना भेटी देऊन आपली बाजू मांडली पाहिजे. त्यानंतर रशिया, अमेरिकेला जाऊन पाकिस्तानच्या कुरापती काय आहेत आणि आम्हाला कारवाई का करावी लागली, पाकिस्तान किती दहशतवादी राष्ट्र आहे हे आधी आपल्या शेजारच्या राष्ट्रांना जाऊन सांगायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. तसेच शरद पवार आमच्या सगळ्यांचे नेते आहेत पण शरद पवार साहेबांनी अजून कोणती भूमिका घेतलेली नाही. फ्लोअर लीडरची पत्रावर सही लागते आणि सुप्रियाताई सुळे या परदेशात आहेत एवढ तुम्ही समजून घ्या असेही संजय राऊत म्हणाले.

ज्यांचा माझा अटकेमध्ये सहभाग होता त्या सगळ्यांना मी जवळजवळ 12 प्रती पाठवलेल्या आहेत. मी आज सरसंघचालक मोहनराव भागवत आणि त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक पाठवणार आहे. त्यांनी सुद्धा हा नरकातला स्वर्ग वाचला पाहिजे आणि त्यांनी जे सरकार सत्तेत आणलेलं आहे त्यांच्या संघ स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने त्या लोकांनी या देशाचा कसा नरक केलेला आहे हे त्यांना कळावं. या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा कसा गळा घोटलेला आहे, लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे हे सुद्धा सरसंघचालकांना या पुस्तकातून कळावं म्हणून मी स्वतः सरसंघचालकांना पुस्तक पाठवून त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक मी पाठवणार आहे असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, कोका कोलाविरुद्ध अजगणी येथे मूक मोर्चा
अजगणी येथील विस्तारित लोटे वसाहतीमधील 88 एकर जमिनीवर होत असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ...
जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे आज उद्घाटन
धक्कादायक! सांडपाणी प्रक्रिया प्लाण्टमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश, एनसीएलच्या तपासातून माहिती समोर
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, देशात आतापर्यंत 4 हजार 866 रुग्ण
भाजपच्या ‘संकल्प’पत्राचा शिवसेनेकडून पंचनामा, शिवसैनिकांच्या प्रश्नावर मंत्री अतुल सावे निरुत्तर
पोलिसांनी वाचवले वृद्ध डॉक्टरचे 1 कोटी 29 लाख रुपये
युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ला रशियाचा करारा जवाब; बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव, ड्रोन हल्ल्यांनी केलं बेजार