पाकिस्तानात सिंधू पाणी प्रश्न पेटला, गृहमंत्र्यांचे घर जाळले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित करून आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा देऊन हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी काsंडी केली. दुसरीकडे बलुच लिबरेशन आर्मीकडून होत असलेले हल्ले आणि तिथे सरकारविरोधातील उभा राहिलेला ज्वलंत संघर्ष अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानात आता सिंधू पाणी प्रश्न पेटल्याचे समोर आले आहे. आता सिंधू नदीवरील वादग्रस्त सहा कालव्यांच्या प्रकल्पाविरोधात नागरिक पेटून उठले असून रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलकांनी आज थेट सिंध प्रांताचे गृहमंत्री झिया उल हसन लंजर यांचे घर पेटवून दिले. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गानजीक मोरो शहरातील मंत्र्यांच्या निवासस्थानावरही हल्ला चढवला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List