पावसाळ्यात आमची घरे उद्ध्वस्त करू नका हो ! आयरे गावातील ‘राघो हाईट्स’च्या रहिवाशांचा टाहो,

पावसाळ्यात आमची घरे उद्ध्वस्त करू नका हो ! आयरे गावातील ‘राघो हाईट्स’च्या रहिवाशांचा टाहो,

आम्ही रक्त आणि घाम गाळून पै पै कमवली आणि त्यातून आमच्या मुलाबाळांना, आई-वडिलांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी डोक्यावर हक्काचे छप्पर घेतले. पण ही इमारत बेकायदा ठरवून तुम्ही जमीनदोस्त का करताय? पावसाळ्यात आमची घरे उद्ध्वस्त करून आम्हाला रस्त्यावर आणू नका हो.. असा टाहो आज राघो हाईट्स या इमारतीतील रहिवाशांनी फोडला. ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी दुसऱ्यांदा गेलेल्या पालिकेच्या पथकाला या रहिवाशांनी रोखले. त्यांच्या तीव्र विरोधामुळे या पथकाला माघारी फिरावे लागले.

डोंबिवली पूर्व येथील आयरे गावात ‘राघो हाईट्स’ ही बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. बिल्डरने या इमारतीतील घरे स्वस्तात विकली आणि स्वतःची तुंबडी भरून तो नामानिराळा राहिला आहे. उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर राघो हाईट्सवरही त्याचा फेरा आला आहे. उज्ज्वला पाटील या महिलेने बेकायदा बांधकाम म्हणून या इमारतीविरोधात सातत्याने तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आज प्रभारी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे पथक जेसीबी व अन्य यंत्रणा घेऊन राघो हाईट्स येथे दाखल झाले.

पोरं-बाळं, म्हातारे-कोतारे रस्त्यावर येतील पालिकेचे पथक कारवाईसाठी येणार याची आधीच कुणकुण लागलेल्या रहिवाशांनी इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यात महिलाचा मोठा सहभाग होता. आज धो धो पावसात ही इमारत पाडली जाणार होती. मात्र पालिका अधिकारी आणि इमारत पाडण्याच्या यंत्रणेला पाहताच महिलांच्या अश्रूचा बांध फुटला. ऐन पावसात आम्हाला बेघर करू नका हो.. आमची मुले-बाळे, म्हातारे-कोतारे रस्त्यावर येतील, आमचे संसार उद्ध्वस्त होतील, ऐन पावसाळ्यात आम्ही कुठे जायचे?, मुलांच्या शाळा सुरू होतील, आमच्या लेकरा-बाळांचे छप्पर हिरावून घेऊ नका हो, असा टाहो रहिवासी महिलांनी फोडला. त्यांच्या तीव्र विरोधामुळे पालिकेचे पथक कारवाई न करता मागे फिरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव? लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
    बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा दमदार अभिनय असो किंवा
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत
मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले
श्री विठ्ठल मंदिर परिसरात VIP वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा निर्णय
प्रभागरचनेसाठी पुणे महापालिका घेणार ‘गुगल अर्थ’चा आधार
फक्त गव्हाचे पीठ नाही, तर निरोगी राहण्यासाठी ‘या’ पौष्टिक पिठांचा आहारात समावेश हवाच, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?