मोदी-शाह बोले.. भाऊ-भाई-दादा हले.. हिंदी सक्तीवरून अंबादास यांचा टोला
केंद्र सरकारने घेतलेले निर्णय कुठलाही विचार न करता राज्याच्या माथी मारले जात आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच मोदी-शाह बोले आणि भाऊ-भाई-दादा हले असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, अभिजात भाषेचे घर असलेल्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती बद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा तरी कशी होऊ शकते? मा.बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणारे मंत्री हिंदी सक्तीचे फतवे काढतात ही त्यांची वैचारिक दिवाळखोरीच आहे. खरं तर, राज्य सरकार केंद्राचे पोस्टमन झाले आहे. केंद्राचे निर्णय विनाविचार राज्याच्या माथी मारायचे एवढंच सध्या सुरू आहे. याचे चटके सरकारला जरूर बसतील असे दानवे म्हणाले. तसेच
मोदी-शाह बोले.. भाऊ-भाई-दादा हले.. असेही दानवे म्हणाले.
अभिजात भाषेचे घर असलेल्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती बद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा तरी कशी होऊ शकते? मा.बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणारे मंत्री हिंदी सक्तीचे फतवे काढतात ही त्यांची वैचारिक दिवाळखोरीच आहे. खरं तर, राज्य सरकार केंद्राचे पोस्टमन झाले आहे. केंद्राचे निर्णय…
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 24, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List