ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त घरांना 25 कोटी रुपयांची मदत, केंद्र सरकारची घोषणा
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जम्मू कश्मीरमध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती. या नुकसानग्रस्त घरांना आता 25 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यात जी घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना दोन लाख रुपये तर ज्यांची घरांचे नुकसान झाले आहे त्यांना 1 लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू कश्मीरमधील 2060 घरांही ही मदत दिली जाईल असे स्पष्ट केले आहे. फक्त जम्मू कश्मीरच नव्हे तर पंजाबमधील सीमा भागात झालेल्या घरांनानाही नुकसान भरपाई दिली जाईल असे सरकारने म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला केला होता. त्यानंतर सीमाभागातील अनेक घरांवर पाकिस्तानने लक्ष्य केले होते. यामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाली आहेत. अनेक कुटुंबांना जवळच्या मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वारात आश्रय घ्यावा लागला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List