फडणवीसांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा सवाल

फडणवीसांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहे. या निवडणुकीत गडबड घोटाळा झाल्याचे त्यांनी आकडेवारीवरून दाखवून दिले आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील आकडेवारी वरून ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असतानाही निवडणूक आयोग गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त 5 महिन्यांत 8% वाढ झाली. तर काही बूथवर 20 ते25 % वाढ झाली. तसेच बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले. पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. असे सर्व सुरू असनाना निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.

ही घटना म्हणजे ही मत चोरी आहे आणि अशा घटना लपवणे ही कबुली आहे. हे सर्व उघड करण्यासाठीच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो,असेही त्यांनी म्हटले आहे. याआधीही राहुल गांधी यांनी महाराष्ट्रील निवडणुकीबाबतचे घोटाळे आकडेवारीसह उघड केले होते. आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतचोरीही उघड केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा
उन्हाळा आला की प्रत्येकालाच ज्या फळाची सर्वात जास्त उत्सुकता असते ते म्हणजे आंबा! पण बाजारातून घेतलेले अनेक आंबे कॅल्शियम कार्बाइड...
सेक्स रॅकेट प्रकरण : खेडशीतील गौरव लॉजवर सात दिवसात 86 जणांची हजेरी
चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पुराचे सावट
IND Vs ENG 1st Test – इंग्लंडच्या सलामीवीरांनी केली ऐतिहासिक भागी, लीड्समध्ये 76 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
टोकन दर्शनाचे बोगस पास बनवून रांगेत प्रवेश करणाऱ्या 6 भाविकांवर कारवाई
Ratnagiri News – नुकसान भरपाई द्या, जीवन संपवण्याची वेळ आणू नका; आंबा बागायतदारांचा सरकारला इशारा
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादानाला मंत्रिमंडळाची मंजुरी, दोन मंत्र्यांचा विरोध; सतेज पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा