वाढत्या महागाईत रेल्वेनेही दिला दणका; तिकीट दरांमध्ये केली वाढ

वाढत्या महागाईत रेल्वेनेही दिला दणका; तिकीट दरांमध्ये केली वाढ

देशातील जनता सध्या वाढत्या महागाईत होरपळत आहे. आता त्यातच रेल्वेनेही जनतेला दणका देत तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. हे वाढीव दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत. रेल्वेच्या नवीन दरानुसार सामान्य द्वितीय श्रेणीत 500 किमी पर्यंत प्रवास करण्यासाठी कोणतीही दरवाढ होणार नाही. मात्र, प्रवास 500 किमी पेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर अर्धा पैसे अतिरिक्त द्यावे लागतील.

रेल्वे 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे दर लागू करणार आहे. या बदलामुळे सामान्य प्रवाशांसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रेल्वेच्या नवीन दरानुसार सामान्य द्वितीय श्रेणीत 500 किमी पर्यंत प्रवास करण्यासाठी भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. मात्र, प्रवास 500 किमी पेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर अर्धा पैसा अतिरिक्त द्यावा लागेल.

मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये (नॉन-एसी) प्रवास करणाऱ्यांना आता प्रति किलोमीटर 1 पैसे जास्त द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, एसी वर्गाच्या तिकिटात सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. तो प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढवण्यात आला आहे. उपनगरीय गाड्यांच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाखो दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळेल.

मासिक हंगामी तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. यापूर्वी रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत, जर तुम्ही रेल्वे तिकीट बुक केले तर तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या चार तास आधी तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे कळते. पण आता रेल्वे एका नवीन प्रणालीवर काम करत आहे. रेल्वे म्हणते की कन्फर्म सीट्स असलेला चार्ट प्रवासाच्या 24 तास आधी जारी केला जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करून वापरल्याने या समस्या उद्भवू शकतात; तज्ज्ञ काय म्हणतात? स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करून वापरल्याने या समस्या उद्भवू शकतात; तज्ज्ञ काय म्हणतात?
भजी, चिप्स, समोसे किंवा काही भाज्या बनवण्यासाठी भरपूर तेल लागते. अशा परिस्थितीत, बरेच लोक उरलेले तेल साठवून ठेवतात. नंतर ते...
तुम्ही जर दूध पीत नसाल तर कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ 5 पेयांचे करा सेवन
पाण्यामुळे सुरकुतणाऱ्या बोटांचे फायदे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल; 90% लोकांना माहित नसेल
ट्रम्प यांना न जुमानता इस्रायलने पुन्हा इराणवर केला हल्ला, डागली क्षेपणास्त्रे
Ratnagiri News – बालवयात हिंदी भाषेची सक्ती अन्यायकारक, हिंदी भाषा सक्तीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा कडाडून विरोध
Pandharpur Wari 2025 – भाविकांनी स्नान करण्यासाठी उतरू नये! चंद्रभागेची पाणीपातळी वाढली, आषाढी यात्रेपूर्वी पूर नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड
Pune News – आपले सरकार सेवा केंद्र चालक अडचणीत, मानधन वेळेच्या वेळी मिळत नसल्याने नाराजी