Kitchen Cleaning Tips – किचनमध्ये पालींची संख्या वाढलीय, काळजी करु नका! हे 3 प्रकारचे स्प्रे पालींवर पडतील भारी

Kitchen Cleaning Tips – किचनमध्ये पालींची संख्या वाढलीय, काळजी करु नका! हे 3 प्रकारचे स्प्रे पालींवर पडतील भारी

घरात एखादी पाल दिसली की, अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु नंतर पालींची संख्या वाढू लागल्यावर मात्र आपल्याला जाग येते. अशावेळी या पालींचं करायचं काय असा प्रश्न पडतो. मुख्य म्हणजे पालींचा वावर किचनमध्ये वाढल्यावर आपल्या आरोग्याला तर धोका असतोच. शिवाय हा धोका अनेकदा तर जीवावर बेतणारा असतो. पाल विषारी असल्यामुळे, किचनमधील पालींचा समूळ नायनाट करणे हे खूप गरजेचे आहे.

तुमच्याही घरात आणि किचनमध्ये पालींची संख्या वाढली असेल तर आता घाबरु नका. हे तीन प्रकारचे स्प्रे आपण घरबसल्या करु शकतो. मुख्य म्हणजे हे स्प्रे पालींचा कर्दनकाळ मानले जातात.

किचनमधील पालींचा समूळ नायनाट करण्यासाठी स्प्रे कसे तयार करावेत?

1- पालींच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, काळी मिरी आणि लसूणच्या मदतीने स्प्रे करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 2 चमचे काळी मिरी पावडर, 5 ते 6 पाकळ्या लसूण, एक स्प्रे बाटली आणि एक लिटर पाणी लागेल.

स्प्रे बनवण्यासाठी प्रथम लसूण पाकळ्या बारीक करा. आता पाणी घ्या आणि त्यात लसूण आणि काळी मिरी पावडर घाला आणि ते चांगले मिसळा. आता हे पाणी रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी स्प्रे बाटलीत हे पाणी भरावे. त्यानंतर किचनच्या प्रत्येक कोपऱ्यात स्प्रे करा. हा एक नैसर्गिक स्प्रे आहे. जो पालींच्या समस्येपासून हमखास मुक्ती देईल.

2- किचनमधील पालींच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी, पुदिन्याची पाने, लवंग आणि दालचिनीची मदत देखील घेता येईल. यासाठी 8 ते 10 पुदिन्याची पाने, 5 ते 6 लवंग आणि 2 चमचे दालचिनी पावडर लागेल.

आता स्प्रे बनवण्यासाठी, प्रथम एक लिटर पाणी घ्या आणि त्यात दालचिनी पावडर, लवंगा आणि पुदिन्याची पाने बारीक करा आणि त्यात घाला. पाणी 5 ते 6 तास झाकून ठेवा. असे केल्याने सर्व गोष्टी पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळतील. यानंतर, पाणी एका स्प्रे बाटलीत ओतावे. जिथे पाल फिरते तिथे हे पाणी स्प्रे करावे.

Kitchen Cleaning Tips- तुमच्या किचनमधील झुरळांचा कर्दळकाळ आहे हे औषध, फक्त 10 रुपये येईल खर्च

3- पालींच्या समस्येवर कांद्याचे पाणी सुद्धा खूप उपयुक्त आहे. स्प्रे बनवण्यासाठी, एक मोठा कांदा, 3 ते 4 तमालपत्र आणि एक लिटर पाणी लागेल.

सर्वप्रथम कांदा किसून घ्यावा, त्यानंतर त्यात तमालपत्र चांगले बारीक करुन घालावे. कांदा आणि बारीक केलेल्या तमालपत्रात पाणी घालावे. हे पाणी काही काळ तसेच ठेवावे. या पाण्याला एक प्रकारचा उग्र दर्प येऊ लागला की, हे पाणी स्प्रे बाॅटलमध्ये भरावे. त्यानंतर पाली ज्या ठिकाणी दिसतात अशा ठिकाणी हा स्प्रे मारावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा
उन्हाळा आला की प्रत्येकालाच ज्या फळाची सर्वात जास्त उत्सुकता असते ते म्हणजे आंबा! पण बाजारातून घेतलेले अनेक आंबे कॅल्शियम कार्बाइड...
सेक्स रॅकेट प्रकरण : खेडशीतील गौरव लॉजवर सात दिवसात 86 जणांची हजेरी
चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पुराचे सावट
IND Vs ENG 1st Test – इंग्लंडच्या सलामीवीरांनी केली ऐतिहासिक भागी, लीड्समध्ये 76 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
टोकन दर्शनाचे बोगस पास बनवून रांगेत प्रवेश करणाऱ्या 6 भाविकांवर कारवाई
Ratnagiri News – नुकसान भरपाई द्या, जीवन संपवण्याची वेळ आणू नका; आंबा बागायतदारांचा सरकारला इशारा
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादानाला मंत्रिमंडळाची मंजुरी, दोन मंत्र्यांचा विरोध; सतेज पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा