दही, मीठ टाकून खावे की साखर घालून? 99 टक्के लोकांना कुठे माहितीये उत्तर?

दही, मीठ टाकून खावे की साखर घालून? 99 टक्के लोकांना कुठे माहितीये उत्तर?

दह्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे भारतीय थाळीत दह्याला महत्त्वाचे स्थान आहे. काही लोकांना तर ताटात दही नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. अनेक अन्न पदार्थ, भाज्या तयार करण्यासाठी दह्याचा घटक म्हणून वापर अगदी सहज होतो. पण दही खाताना ते मीठ टाकून खावे की साखर घालून खावे याविषयीचा संभ्रम असतो. आता या लेखानंतर तुमच्या मनातील हा संभ्रम दूर होईल .

मीठासह दही खाल्यास होते काय?

दह्यात मीठ घालून खाल्यास त्यातील गुड बॅक्टेरिया, चांगले सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे दही खाणे शरीरासाठी फारसे लाभदायक नसते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर दह्यात मीठ टाकू नका. हे शरीराला अपायकारक आहे. आयुर्वेदानुसार, दह्यात मीठ टाकून खाल्यास शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसून येतो. पित्ताची समस्या वाढते. पित्तासाठी दह्यात मीठ घालून खाणे हे विषासमान आहे. दह्यात मीठ घालून खाल्ल्यास पचनास त्रास होतो. तुम्हाला जर पोटाचे आजार असतील तर ही पद्धत चुकीची आहे. अशा पद्धतीने दह्याचे सेवन आरोग्यास अपायकारक ठरेल. खोकला असेल तर दह्यात मीठ टाकून खाऊ नका.

दह्यासोबत साखर किती फायदेशीर?

दह्यात साखर टाकून खाणे अनेकांना आवडते. त्याचा थेट शरीरावर परिणाम दिसून येतो. साखर टाकलेले दही शरीरासाठी फायदेशीर ठरते. साखरेमुळे दह्यातील सूक्ष्म जीवाणू नष्ट होत नाहीत. पोटातील जळजळ कमी होते. पोटाला थंडावा मिळतो. साखर घातल्याने शरीराला उष्मांक, कॅलरीज अधिक प्रमाणात मिळते. थोडं वजन वाढण्याची शक्यता असते. मधुमेहींनी गोड दह्यापासून चार हात दूर राहावे. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची भीती असते.

दही खावे कसे?

शरीरासाठी दह्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. अगदी कमी प्रमाणात मीठ आणि साखर घालून ते खाता येते. पण तुम्हाला सर्दी-पडसं, उच्च रक्तदाब, डायबेटिज अथवा इतर आजार असेल तर वैद्यकीय तज्ज्ञाच्या सहाय्यानेच तुम्ही दह्याचे सेवन करणे आवश्यक आहे. दही खाण्यापूर्वी अथवा नंतर लागलीच गरम पेय, पदार्थ खाणे टाळले तर फायदेशीर होईल. दह्यासोबत मद्यपेय पिणे हा तर घातक प्रकार आहे. त्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतो. काही जण रात्री अति दारु पिल्यावर सकाळी खापरातील दह्याचे सेवन करतात. त्यामुळे शरीरातील उष्णता आणि पोटाचे आजार कमी होतात असा दावा करण्यात येतो. पण असा प्रयोग करताना वैद्यकीय तज्ज्ञाचा, आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या. साखर असो वा मीठ ते अगदी कमी प्रमाणात वापरल्यास दह्याचे सेवन फारसे अपायकारक ठरत नाही.

डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतांआधारे ही सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे. तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या. टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;