Uttarakhand News – केदारनाथ यात्रेतील काही भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी तर एक बेपत्ता

Uttarakhand News – केदारनाथ यात्रेतील काही भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी तर एक बेपत्ता

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या काही भाविकांचा अपघात झाला. काही भाविक बुधवारी जंगलचट्टी येथील पोल क्रमांक 153 जवळील डोंगरावरून दरीत पडले. यात दोन भाविकांचा मृत्यू झाला तर, तीनजण जखमी झाले आहेत. एक भाविक बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच DDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

ही घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. केदारनाथ यात्रेवर असलेले काही भाविक हे जंगल चट्टी येथे पोल नंबर 153 जवळ दरीत कोसळले. यानंतर DDRF ने बचावकार्य सुरू केले. आता पर्यंत DDRF ने दोघांचे मृतदेह आणि एका जखमी भाविकाला बाहेर काढले आहे. जखमी भाविकाला गौरीकुंड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. आणखी एका जखमीसाठी आणि बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी बचाव पथक दरीत उतरले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानात एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांत युद्ध होणार अशी...
Air India चा खोळंबा! आज तीन उड्डाणे केले रद्द, कारण काय? वाचा
मल्टिस्टेट बँकेने घेतला शेतकर्‍याचा बळी, ठेव परत मिळत नसल्याने शेतकर्‍याने बँकेच्या दारातच संपवले जीवन
Photo – रविनाची सावली, राशा दिसते गोड बाहुली!
BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? वाचा
Air India Plane Crash – विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, भावाच्या पार्थिवाला खांदा देताना अश्रू अनावर
संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका