Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या! गोरगरीबांचा जीव गेला तर जबाबदार कोण ?

Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या! गोरगरीबांचा जीव गेला तर जबाबदार कोण ?

संगमेश्वर शास्त्री पूल ते एसटी स्थानक दरम्यान सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणासाठी डोंगर खोदण्याचे काम वेगाने पार पडले, मात्र त्याचे पर्यावरणीय परिणाम लक्षात न घेतल्याने आता दरडी कोसळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. या मार्गावरील नागरिक सध्या अक्षरशः जीव मुठीत धरून राहत आहेत.

सावधगिरीचा अभाव 

या भागातील डोंगर 30-40 फूट उंचीने सरळ कापण्यात आले. त्यावेळी ना कोणत्याही बांधकाम अभियंत्याने, ना विकासकाने, ना लोकप्रतिनिधींनी संभाव्य धोका लक्षात घेतला. खोदलेल्या मातीतून पावसाचे पाणी निसटून वाहत असल्याने डोंगर दरड कोसळण्याच्या घटनांना अटकाव राहिलेला नाही. पावसाळा सुरू होण्याआधीच या भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये संरक्षक भिंतींचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.

काम सुरू, पण नियोजन ढासळलेले

दरड कोसळल्यानंतर काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले खरे, मात्र त्या भिंतींची उंची आणि मजबुती यावर कुणाचेही लक्ष नाही. अशाच अर्धवट भिंतींसमोर दरड पुन्हा कोसळली आणि बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला. नागरिकांनी संतप्त होत रस्ता रोको केला, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले; पण परिणाम मात्र शून्य!

ठेकेदारांचा बेजबाबदारपणा ठळकपणे समोर

नवीन काँक्रीट रस्ता काही ठिकाणी खचला आहे, तर अनेक ठिकाणी त्यात मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमधून पावसाचे पाणी वाहत जाऊन भविष्यात या रस्त्यावर भगदाडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अक्षम्य दुर्लक्षामुळे जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात या रस्त्यावर भगदाडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अक्षम्य दुर्लक्षामुळे जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

पाठपुरावा व्यर्थ?

याबाबत माध्यमांनी वारंवार ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. पण “ये रे माझ्या मागल्या” या म्हणीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा अजूनही डुलक्या घेत आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेली निसर्गाची हानी डोळ्यांदेखत घडतेय, आणि प्रशासन केवळ वेळ मारून नेण्यात समाधान मानतेय.

डोंगर खोदाईचे नियोजन कोठे अडकलं?

काटकोनात खोदलेले डोंगर कोणत्या वैज्ञानिक आधारावर स्थिर राहतील, याचे नियोजन आणि मूल्यांकनच झालेले नाही. अन्य भागांमध्ये उभारलेल्या संरक्षक भिंतींना तडे गेले आहेत, काही ठिकाणी नव्याने बांधलेल्या भिंती आधीच कोसळल्या आहेत. हे सर्व म्हणजे विकासकामांतील ढिसाळ गुणवत्ता आणि ठेकेदारांचा मनमानी कारभार याचे जिवंत उदाहरण आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरळी पोलीस कॅम्पमध्ये सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारण्यासाठी विशेष निधी द्या, आदित्य ठाकरे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र वरळी पोलीस कॅम्पमध्ये सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ उभारण्यासाठी विशेष निधी द्या, आदित्य ठाकरे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येणाऱ्या पोलीस कॅम्पमधील पाण्याच्या 20 टाक्यांपैकी 12 टाक्या...
धक्कादायक! विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गुप्तांगात भरली मिरची पावडर
भाजप नेते जे. एम. म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
IPL मध्ये अनोख्या सेलिब्रेशनमुळे वादग्रस्त ठरलेल्या दिग्वेश राठीचा भेदक मारा, 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट; पाहा Video
महायुती सरकारचे ट्रान्सफर सत्र सुरुच, चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
महिला आणि पुरुषांनो, तुम्ही या समस्येमुळे निराश आहात का? आयुर्वेदात रामबाण इलाज; रिसर्चचा दावा काय?
Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या! गोरगरीबांचा जीव गेला तर जबाबदार कोण ?