पहलगाम हल्ल्यानंतर आमिर खान का गेलेला नैराश्यात? वाचा
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यावर (22 एप्रिल) अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी मौन पुकारले होते. परंतु नुकतेच आमिरने या झालेल्या हल्ल्यानंतर आता त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. अलिकडेच आमिर खानला त्याच्या मौनावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले की, पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तो नैराश्यात होता आणि बरेच दिवस घराबाहेर पडला नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा ट्रेलर थांबवला होता आणि अंदाज अपना अपनाचा प्रीमियरही रद्द केला होता.
एका कार्यक्रमात आमिर खान म्हणाला की, ‘हा हल्ला, आपल्या देशात, आपल्या लोकांवर दहशतवादी हल्ला, हे घृणास्पद कृत्य आहे. फक्त भ्याड लोकच हे असे विघातक कृत्य करतात. दहशतवादी आपल्या देशात घुसून लोकांवर गोळ्या झाडत आहेत, कुटुंबातील सदस्यांवर गोळ्या झाडत आहेत. मी तिथे असू शकलो असतो, तुम्हीही तिथे असू शकला असता. ते लोकांचा धर्म विचारत आहेत आणि नंतर गोळ्या झाडत आहेत, याचा अर्थ काय?’
आमिर पुढे म्हणाला, ‘मी सोशल मीडियावर नाही. गोष्टी घडतात, लोक दर सेकंदाला बोलतात. मी याबद्दलही बोललो आहे. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, मला विचारण्यात आले. हा हल्ला केवळ आपल्या देशावरच नाही तर आपल्या एकतेवरही हल्ला आहे.
आमिरला ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर तो म्हणाला होता की, ‘आमच्या चित्रपटाचा ट्रेलर खूप आधी येणार होता. आपल्या देशात हल्ला झाला होता, म्हणून मी लगेच सर्व काही रद्द केले. ‘अंदाज अपना अपना’ चा प्रीमियरही त्या दिवशी होणार होता, पण मी तो रद्द केला. ज्याप्रमाणे प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात राग होता, त्याचप्रमाणे माझेही मन दुखावले होते, त्याच भावना माझ्या आतही होत्या. खरंतर, मी बरेच दिवस नैराश्यात होतो आणि घराबाहेरही पडलो नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List