एअर इंडियाच्या उड्डाणात तीन तासांहून अधिक विलंब, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

एअर इंडियाच्या उड्डाणात तीन तासांहून अधिक विलंब, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाच्या खराब सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया उड्डाण AI 2971 मध्ये तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. याच विमानाने त्याही प्रवास करत आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत X वर एक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी एअर इंडियाच्या गैरव्यवस्थापनावर आणि प्रवाशांप्रती उदासीनतेवर टीका केली आहे. त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय आणि मंत्र्यांना हस्तक्षेप करून एअर इंडियाला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या उड्डाण AI 2971 ने प्रवास करत होत्या. मात्र हे विमान उड्डाण करण्यासाठी तीन तासांहून अधिक काळ उशिराने निघाले. या विलंबाबाबत एअर इंडियाकडून प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

सुप्रिया सुळे याबाबत X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, प्रवाशांना उत्तम सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी म्हटले, “एअर इंडियाची ही उदासीनता अस्वीकार्य आहे. प्रवाशांना अडकून पडावे लागते आणि त्यांना कोणतेही सहाय्य मिळत नाही. याबाबत तातडीने कारवाई करून प्रवाशांना न्याय मिळाला पाहिजे.” त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय आणि टाटा समूहाकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल