तुंबलेल्या शहराला, घरांच्या नुकसानीला जबाबदार कोण? शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

तुंबलेल्या शहराला, घरांच्या नुकसानीला जबाबदार कोण? शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

जोरदार पावसामुळे कोल्हापूर शहर पुन्हा एकदा तुंबले. अनावश्यक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या रस्त्याच्या उंचीवरून लोकांच्या घरांत, दुकानात घुसलेले पाणी हतबलपणे पाहणारा कोल्हापूरचा नागरिक… असे एक विदीर्ण आणि विदारक चित्र कोल्हापूरला आज पाहायला मिळाले. एक जबाबदार म्हणून अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींच्या अपयशासह लोकांकडून नियमित कर घेणाऱया महापालिकेचा असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात अजूनही मोठय़ा प्रमाणात नालेसफाई, गटारांची दुरुस्ती, सफाई व वाढलेल्या रस्त्यांची उंची त्वरित बाजूच्या घरांना योग्य ती सम प्रमाणात करून पाण्याचा निचरा करावा, अन्यथा भर पावसात महापालिकेसमोर कोल्हापूरच्या जनतेसह शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला. या ओढय़ाचे पाणी शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनीतील अनेकांच्या घरांमध्ये घुसले. या पाण्यातून सुभाष आप्पासाहेब घाडगे, शुभांगी सुभाष गाडगे यांना सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे. स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, ड्रायव्हर रजाक मुलानी, फायरमन रोहन लकडे यांनी या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Crime news – उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून प्रियकराने केली महिलेची हत्या Crime news – उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून प्रियकराने केली महिलेची हत्या
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील हॉटेल सागरिकामध्ये प्रियकरानेच आपल्या विवाहित प्रेयसीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी...
50 लाखांच्या मुद्देमालासह चोरटे गजाआड, 12 तासांत ठोकल्या बेड्या; कोल्हापूर पोलिसांची कामगिरी
सीडीएस लष्कराऐवजी हवाई दलाचा हवा, हिंदुस्थानवर पुन्हा हल्ला होऊ शकतो! संरक्षणतज्ञ प्रवीण साहनी यांचा सावधगिरीचा इशारा
Air India Plane Crash – मी कसा वाचलो मलाच माहीत नाही… एकमेव बचावलेल्या विश्वास कुमार रमेश यांनी सांगितली आपबिती
आई, मी फ्लाइटवर जातोय… इरफानचा निरोप ठरला अखेरचा, अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीतील इरफान शेखचा दुर्दैवी अंत
पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष; दोन मांत्रिक गजाआड, हॉटेलमध्ये सापडले लिंबू, नारळ, साहित्य
डोक्यावर अक्षता पडण्याआधीच  रोशनीने घेतला जगाचा निरोप