India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा झटका

India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा झटका

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ जय्यत तयारी करत आहेत. अशातच आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हिंदुस्थानात परतल्याचे वृत्त समोर आले आहे. गौतम गंभीर यांच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे गौतम गंभीर तात्काळ हिंदुस्थानात दाखल झाला आहे.

49 चेंडूत 150 धावा, 19 षटकारांची आतषबाजी; IPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूनं रोहित शर्मा, ख्रिस गेलचा विक्रम मोडला

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना 20 जून पासून हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू होणार आहे. सामना सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी सरावाला सुरूवात केली आहे. गौतम गंभीर सुद्धा खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी इंग्लंडमध्ये उपस्थित होते. परंतु गौतम गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना ह्रदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे गौतम गंभीरने तात्काळ हिंदुस्तानात येण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जूनपर्यंत गौतम गंभीर पुन्हा इंग्लंडमध्ये टीम इंडियासोबत जोडले जाणार असल्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी ‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी
साधा माणूसही स्वस्तात विमान प्रवासात जात असल्याच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, सरकारचे सुरक्षिततेला प्राधान्य नाही. नागरी उड्डाण क्षेत्रात अनेक वर्षांपासून...
मुंबईत उतरण्याआधी विमानाच्या घिरट्या, टर्ब्युलन्सवेळी प्रवाशांची आरडाओरड! अहमदाबाद घटनेनंतर भिती कायम
जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने लटकावला, 24 जूनपासून भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार
नवी मुंबईत 27 कामगारांना वायुबाधा, ‘स्वास्थ्य अ‍ॅग्रो’मध्ये गॅसगळती; 15 महिलांचा समावेश
Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे
दिव्यातील बेकायदा इमल्यांवर महापालिकेचा बुलडोझर, कोर्टाच्या आदेशानंतर आयुक्तांवर नामुष्की