टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचे सहकाऱ्यांना पत्र

टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचे सहकाऱ्यांना पत्र

टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी त्यांच्या टाटा समूहातील सहकाऱ्यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी ‘गुरुवारचा दिवस हा टाटा समूहाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. या कठिण प्रसंगाचा आपण सर्वांनी एकत्र मिळून सामना करुया असे आवाहन एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना केले आहे.

”हा एक अतिशय कठीण क्षण आहे. काल जे घडले ते धक्कादायक होतं. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावणे हे फार मोठे दुख आहे. परंतु एकाच वेळी इतक्या लोकांचे मृत्यू होणे हे अनाकलनीय आहे. टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. सध्या सांत्वनासाठी शब्द नाहीत, परंतु माझ्या संवेदना या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबियां सोबत आहेत. आम्ही कायम त्यांच्यासोबत उभे आहोत. इतरांप्रमाणेच आम्हालाही काय घडले ते समजून घ्यायचे आहे. आम्हाला आता त्याबाबत काहीच माहित नाही, पण आम्हाला कळेल. गेल्या 24 तासात हिंदुस्थान, युके आणि अमेरिकेतील तपास पथके अपघाताची चौकशी करण्यासाठी अहमदाबादला पोहोचली आहेत. त्यांना आमचे पूर्ण सहकार्य आहे आणि आम्ही चौकशीत पूर्णपणे पारदर्शक राहू. समाजाप्रती असलेली आमची जबाबदारी आम्ही जानतो, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

”सध्या आपण या दुर्घटनेची कारणं शोधण्याचे प्रयत्न करत आहोत. आपल्याभोवती अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही बरोबर असू शकतात, तर काही चुकीचे असू शकतात. पण मला असं वाटतं आपण सर्वांनी तर्कवितर्क न लावता थोडा धीर धरला पाहिजे. काल आपण एक प्रचंड जीवितहानी पाहिली आहे. नियमित वापरात असलेले हे विमान अपघातग्रस्त कसे झाले याचा तपास सुरू आहे. लवकरच आपल्याला त्यामागचे कारण स्पष्ट होईल. एकदा आम्हाला तथ्ये पडताळून पाहू द्या त्यानंतर आम्ही तुम्हाला याबद्दल सांगूच. एअर इंडियाचा ताबा घेतल्यापासून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची पहिली आणि सर्वात मोठी प्राथमिकता होती. त्यात कोणतीही तडजोड केली गेली नाही. हा एक कठीण क्षण आहे, परंतु आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटणार नाही, असे टाटा ग्रृपचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी ‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी
साधा माणूसही स्वस्तात विमान प्रवासात जात असल्याच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, सरकारचे सुरक्षिततेला प्राधान्य नाही. नागरी उड्डाण क्षेत्रात अनेक वर्षांपासून...
मुंबईत उतरण्याआधी विमानाच्या घिरट्या, टर्ब्युलन्सवेळी प्रवाशांची आरडाओरड! अहमदाबाद घटनेनंतर भिती कायम
जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने लटकावला, 24 जूनपासून भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार
नवी मुंबईत 27 कामगारांना वायुबाधा, ‘स्वास्थ्य अ‍ॅग्रो’मध्ये गॅसगळती; 15 महिलांचा समावेश
Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे
दिव्यातील बेकायदा इमल्यांवर महापालिकेचा बुलडोझर, कोर्टाच्या आदेशानंतर आयुक्तांवर नामुष्की