वन्य जिवांची तस्करी करणारा अटकेत

वन्य जिवांची तस्करी करणारा अटकेत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. बँकॉक येथून आलेल्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने अटक करून त्याच्या बॅगेतून दुर्मिळ वन्यजीव जप्त केले. अटक आरोपी हा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजिवांच्या तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली आहे. बँकॉक येथून एक जण दुर्मिळ वन्यजीव घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. अटक प्रवासी विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत दुर्मिळ वन्यजीव आढळून आले. चाको गोल्डन नी टॅरंटुला (१), टॅरंटुला (ब्राचीपेल्मा प्रजाती) (१), इगुआना (इगुआना प्रजाती) (८० ५० जिवंत, ३० मृत), ल्युसिस्टिक शुगर ग्लायडर्स (६, फायर टेलेड सनबर्ड (१ मृत)), पर्पल थ्रोटेड सनबर्ड (१ मृत), क्रेस्टेड फिंचबिल पक्षी (२), मधुर अस्वल (पोटोस फ्लेव्हस) (१), ब्राझिलियन चेरी हेड कासव (२) आदी पंचनामा करून जप्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू! तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू!
गेल्या 15 वर्षांपासून अडथळय़ांच्या चक्रव्यूहात अडकलेली सोलापूरची विमान सेवा आजपासून सुरू झाली. पेंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या...
दोन वर्षांत हिंदुस्थानातील रस्ते अमेरिकेसारखे होतील
सोनमनेच केली पतीची हत्या, शिलाँग पोलिसांनी घेतले ताब्यात
सांगली पालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक, लाच मागितल्याने कारवाई
ग्रेटा थनबर्ग यांच्यासह त्यांचे जहाज इस्रायलच्या ताब्यात, पॅलेस्टिनींसाठी मदत साहित्य घेऊन जात होते
बिहारचे डबल इंजिन सरकार महिलांसाठी धोकादायक, प्रियांका गांधी यांचा नितीश कुमार सरकारवर हल्ला
मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर महागाई वाढली, महामार्ग बंद केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा