लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरुन वाद विकोपाला, वधूच्या वऱ्हाड्यांकडून नवरदेवाची हत्या

लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरुन वाद विकोपाला, वधूच्या वऱ्हाड्यांकडून नवरदेवाची हत्या

लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरून झालेला वाद नवरदेवाच्या जीवावर बेतला आहे. नवरीकडील मंडळींनी नवरदेवाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे आनंदाच्या दिवशीच मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये ही घटना घडली.

गाझीपूरच्या जगदीशपूर गावात लग्नाची मिरवणूक सुरू होती. यावेळी मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता. नवरीच्या कुटुंबातील तरुण डीजेच्या तालावर नाचत होता. काही कारणातून त्यांचे नवरदेवाच्या नातेवाईकांशी भांडण झाले. यावेळी नवरदेवाच्या वडिलांनी भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. मात्र तरुणांनी नवरदेवाच्या वडिलांना मारहाण केली.

वडिलांना मारहाण होताना पाहून नवरदेव मध्ये पडला. मद्यधुंद तरुणांनी नवरदेवालाही मारहाण केली. एकाने बंदुकीचा दस्त्याने डोक्यात मारहाण केली. यामुळे नवरदेव बेशुद्ध झाला. त्याला गाझीपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला मार लागल्याने नवरदेव कोमात गेला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

98 लाखांचे हिरे घेऊन हिरे व्यापाऱ्याचे पलायन 98 लाखांचे हिरे घेऊन हिरे व्यापाऱ्याचे पलायन
सुमारे 98 लाख रुपयांचे हिरे घेऊन एका हिरे व्यापाऱ्याने पलायन केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्या व्यापाऱ्याविरोधात...
आजारावर मात करून विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर, ‘सुंदर मी होणार’ नाटकात साकारणार भूमिका
अकरावी प्रवेश प्रक्रिया, दोन दिवसांत 9 हजार विद्यार्थ्यांनी निवडले कॉलेज
डिग्री MBBSची, आठ महिन्यांत 50 रुग्णांवर हृदयाची शस्त्रक्रिया, अशी झाली मुन्नाभाईची पोलखोल
Akola News – धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले
यूपीत बांके बिहारी कॉरिडोरवरून हंगामा, 500 कोटींच्या प्रकल्पाविरोधात पुजाऱ्यांचा योगी सरकार विरोधात शंखनाद!
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मंदिर समिती बरखास्तीची मागणी