बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणात ट्विस्ट; हायकोर्टातील सुनावणीआधी KSCA च्या दोन अधिकाऱ्यांचा राजीनामा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. 18 वर्षात पहिल्यांदाच ट्रॉफीवर नाव कोरल्याने आरसीबीच्या चाहत्यांनी रात्रभर जल्लोष केला. त्यानंतर आयोजित विजयी परेडदरम्यान एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली आणि यात 11 चाहत्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटकर्क्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरसीबीच्या मार्केटिंग हेंडसह चौघांना अटक करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. दुसरीकडे कर्नाटक हायकोर्टानेही कर्नाटक सरकारला नोटीस पाठवून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 जून रोजी होणार आहे.
या सुनावणीपूर्वीच मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव ए. शंकर आणि खजीनदार ई.एस. जयराम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बंगळुरुतील चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत दोघांनी पद सोडले.
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनांमुळे व आमची भूमिका मर्यादित असली तरी नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही काल रात्री कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि खजिनदारपदाचा राजीनामा अध्यक्षांना पत्राद्वारे पाठवला आहे, असे निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List