“…हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले”, संजय राऊत यांचं सरसंघचालकांना पत्र, पुस्तकाची प्रतही पाठवली

“…हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले”, संजय राऊत यांचं सरसंघचालकांना पत्र, पुस्तकाची प्रतही पाठवली

ईडीने बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकलेले असताना 100 दिवसात आलेल्या अनुभवांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. या पुस्तकाची मागणी वाढत असतानाच खुद्द संजय राऊत यांनीही राज्यातील विविध नेत्यांना आपल्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे. आता संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही ही प्रत पाठवली आहे. राऊत यांनी स्वत: आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

आदरणीय सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांना “नरकातला स्वर्ग“ची प्रत आज पाठवली. संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या पुस्तकाच्या प्रतिसोबत राऊत यांनी भागवत यांना एक पत्रही पाठवले आहे.

भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक एका बैठकीत वाचलं! संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा

‘सोबत ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनासाठी पाठवत आहे. देशातील लोकशाहीविरोधी राज्यकर्त्यांनी मला खोट्‌या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले. माझा व माझ्या कुटुंबियांचा छळ केला. माझी कायदेशीर मार्गाने सुटका होऊ नये म्हणून न्याय यंत्रणेवरही दबाव आणला. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले. 1975 च्या आणीबाणी पर्वात हेच घडले व त्याविरुध्द संघ परिवाराने संघर्ष केल्याचे सांगितले जाते. माझ्या लेखनात अलीकडच्या काळातले अंधार युग चित्रित झाले आहे. आपल्याला लेखनाचा हा प्रयत्न नक्कीच आवडेल’, असे या पत्रामध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Fact Check : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य Fact Check : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात असे म्हटले जात आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्च...
जसबीर सिंग आणि ज्योती मल्होत्रा यांची समोरासमोर चौकशी, हेरगिरीवरून पाकिस्तानचा पर्दाफाश होणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही, निवडणूक आयोग गप्प का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्ती करा नाहीतर खुर्ची खाली करा – अंबादास दानवे
Chhattisgarh Encounter – छत्तीसगमध्ये चकमक सुरू, सुरक्षा दलाच्या गोळीबारात 5 नक्षलवाद्यांचा खात्मा
Photo – वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनाचे; मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान
काळे चणे कोणत्या प्रकारे खाणे जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत