महाराष्ट्रातील निवडणूक त्यांनी जिंकली नसून चोरली; संजय राऊत यांचा घणाघात
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रच्या विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत सविस्तरपणे पाच मुद्द्यांद्वारे माहिती दिली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपले मत मांडले. राहुल गांधी यांनी सर्व सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील निवजणूक भाजपने जिंकली नसून चोरली आहे, हे स्पष्ट झाले, असा घणाघात त्यांनी केला.
निवडणूक मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीला मोदी पिछाडीवर होते. वाराणसीत नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित झाला होता. त्यासाठी दिल्लीतून यंत्रणा हलली. मतमोजणी थांबवण्यात आली. मतदान केंद्रातील वीज घालवण्यात आली. त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला. सर्व डेटा उडाला, नवीन मशीन मागवण्यात आल्या. दोन तासात त्यांनी ही गडबड आणि गोंधळ घातला. मतमोजणी हायजॅक केली आणि मोदींचा विजय घडवून आणला. तोच प्रकार महाराष्ट्रात करण्यात आला. महाराष्ट्रच्या निवडणुकीत त्यांनी विजय चोरला. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, ईव्हीएम मशिन हायजॅक केल्या. शेवटच्या दोन तासात 60 ते 65 लाख मतदान वाढवले गेले. ठरलेल्या सेटिंगप्रमाणे हे सर्व करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही मुद्दा आतंरराष्ट्रीय स्तरावर नेला. हिंदुस्थानची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे, हे जगाला यातून समजले, असे संजय राऊत म्हणाले.
जगभरात अनेक ठिकाणी देशाची लोकशाही आणि मोदी आणि सरकारचा अपमान होत आहे. त्याला हेच कारण आहेत. मोदी आणि त्यांचा पक्ष लोकशाही मनत नाही. हुकूमशाही पद्धतीने ते कामकाज करत आहेत. त्यांच्याकडून निष्पक्ष निवडणुका घेतल्या जात नाहीत. हे जगाला समजल्यामुळे मोदी आणि सरकारचा जगभरात अपमान होत आहे. तसेच त्यांच्यामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List