जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी

जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी

मला जेव्हा विचारलं जातं की किती नुकसान झालं, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा आहे. तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे. नुकसानासंदर्भात बोलणे योग्य होणार नाही. जेव्हा तुम्ही क्रिकेट कसोटी मॅच डावानं जिंकता तेव्हा किती विकेट गेल्या हे महत्त्वाचे नसते, असे महत्त्वपूर्ण विधान चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी आज केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र्ा या विभागातर्फे ‘फ्युचर वॉर्स अॅण्ड वॉरफेअर’ या विषयावर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारूशीला गायके आदी उपस्थित होते.

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी हिंदुस्थानचे किती नुकसान झाले, यासंदर्भात भाष्य करताना सीडीएस अनिल चौहान यांनी क्रिकेट कसोटी मॅचचे आणि फुटबॉलचे उदाहरण दिले. जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट मॅच खेळत असता आणि डावाने जिंकता तेव्हा किती विकेट गेल्या, किती बॉल आणि किती फलंदाज बाद झाले हे महत्त्वाचे नसते. फुटबॉल सामन्यात एका संघाने तीन विरुद्ध दोन गोलने विजय मिळविला तर त्या संघाचा विजय महत्वाचा असतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

पाकिस्तानला 8 तासांत गुडघे टेकवायला लावले

पाकिस्तानने ज्या लष्करी कारवाईसाठी 48 तास सांगितले होते ती मोहीम त्यांनी अवघ्या आठ तासांतच आटोपती घेतली. पाकिस्तानने युद्ध विरामाची भाषा केली. पाकिस्तानने हिंदुस्थानच्या डीजीएमओशी पह्न करून चर्चा केली. अवघ्या आठ तासांत पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले, अशी माहिती सीडीएस चौहान यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला
देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला....
‘बीकेसी’च्या ‘सेबी’ कार्यालयात साप आणि अजगरांचा सुळसुळाट, एकाच ठिकाणी आढळली बारा पिल्ले
महायुतीच्या काळात भ्रष्टाचारी मोकाट, लाचखोर सरकारी बाबूंवर मुदतीत खटले भरण्यात टाळाटाळ
हिंदुस्थानकडून शस्त्रसंधी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच! रशियाचाही अमेरिकी दाव्याला दुजोरा
ऐकावे ते नवलच! मोदींनी घरात लावले सिंदूरचे रोपटे
बंगळुरू चेंगराचेंगरी, पोलीस आयुक्तांसह 8 अधिकारी निलंबित; आरसीबीविरुद्ध गुन्हा
मुंबई ते नागपूर अवघ्या आठ तासांत, ‘समृद्धी’च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण