राज्य सरकारने शेतमाल दिल्लीला पाठविल्यास केंद्र सरकार खर्च देईल

राज्य सरकारने शेतमाल दिल्लीला पाठविल्यास केंद्र सरकार खर्च देईल

‘राज्य सरकारने संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा टोमॅटो, कांदा, बटाटा हा शेतमाल थेट दिल्ली आणि मुंबई येथे पाठविला तर त्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार देईल. याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.

विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पदयात्रा आणि कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी मेळावा झाला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते. शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘विविध भागांत शेती उत्पादने वेगळ्या प्रकारे घेतली जावीत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे. टोमॅटोमध्ये विशेष संशोधन करण्याची गरज आहे. फक्त भाजीपुरता टोमॅटो न ठेवता, तो टिकाऊ आणि भाजीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वापरला जाऊ शकतो. त्यासाठी टोमॅटो बियाण्यावर संशोधन होणे आवश्यक आहे.’

…तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत

‘कृषिमंत्री आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जोपर्यंत जात नाही, संवाद साधत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. केंद्राच्या कृषी विभागांतर्गत 16 हजार शास्त्रज्ञ आहेत. ते कृषी खात्याच्या प्रयोगशाळा किंवा कार्यालयात असतात. ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नाहीत तोपर्यंत शेतीमध्ये प्रगती होणार नाही. त्यामुळे हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ओडिशा येथून अभियानाला सुरुवात केली असून, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथून आता महाराष्ट्रात आलो आहे. त्यानंतर पंजाब आणि उत्तराखंडसह देशभर जाणार आहे.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला
देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला....
‘बीकेसी’च्या ‘सेबी’ कार्यालयात साप आणि अजगरांचा सुळसुळाट, एकाच ठिकाणी आढळली बारा पिल्ले
महायुतीच्या काळात भ्रष्टाचारी मोकाट, लाचखोर सरकारी बाबूंवर मुदतीत खटले भरण्यात टाळाटाळ
हिंदुस्थानकडून शस्त्रसंधी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच! रशियाचाही अमेरिकी दाव्याला दुजोरा
ऐकावे ते नवलच! मोदींनी घरात लावले सिंदूरचे रोपटे
बंगळुरू चेंगराचेंगरी, पोलीस आयुक्तांसह 8 अधिकारी निलंबित; आरसीबीविरुद्ध गुन्हा
मुंबई ते नागपूर अवघ्या आठ तासांत, ‘समृद्धी’च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण