धुळ्याच्या विश्रामगृहात सरकारी अधिकाऱ्यांकडून दहा आमदारांना 5 कोटींचा मलिदा, माजी आमदार अनिल गोटेंची शिवसैनिकांसह धडक

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सुरू असलेल्या सत्ताधारी आमदारांच्या वसुलीचा भंडाफोड आज झाला. शासनाच्या अंदाज समितीतील दहा आमदारांना देण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱयांनी पाच कोटींचा मलिदा आणला होता. त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसैनिकांनी धडक दिली आणि ज्या खोलीत वसुली सुरू होती त्या 102 क्रमांकाच्या खोलीला शिवसैनिकांनी टाळे ठोकले. त्यानंतर तिथेच ठिय्या देत जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीतच ही खोली उघडावी, अशी मागणी गोटे यांनी केली आहे.

अनिल गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱयांनी या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे. जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत ही खोली उघडावी अशी मागणी शिवसैनिकानी केली. याबाबत पोलीस अधीक्षक तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागालाही कळवण्यात आले मात्र, चार ते पाच तास उलटून गेल्यानंतरही कुणीच तिकडे फिरकले नाही.

सकाळपासून थैल्या घेऊन अधिकारी येत होते!

राज्य सरकारची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱयावर आली होती. या समितीला मलिदा देण्यासाठी जिह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱयांनी पैसे गोळा केले आणि ते विश्रामगृहावर आणले असा दावा अनिल गोटे यांनी केला. 102 नंबरच्या खोलीमध्ये हे पैसे असल्याचा गोटे यांचा आरोप आहे. या समितीच्या लोकांना भेटण्यासाठी सकाळपासून वेगवेगळ्या खात्यातील लोक येत होते आणि ते थैल्या देऊन जात होते असाही दावा गोटे यांनी केला.

शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष असून शिवसैनिकांची धाड पडण्याआधी वसुली करणारे सगळेच तिथून निसटले. त्यात मंत्र्याच्या पीएचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे?

धुळे विश्रामगृहात राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. तिथेच आज विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठीही मलिदा जमा करण्यात आला. तेथे शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. त्या खोलीत किमान 5 कोटी रुपये आहेत. कलेक्टरांच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे. पण सगळेच पळ काढत आहेत, असे नमूद करत महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच, अशी तोफ संजय राऊत यांनी एक्स पोस्टमधून डागली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलिसांची नजर चुकवत सलमानच्या अपार्टमेंटमध्ये शिरला तरुण अन्… पोलिसांची नजर चुकवत सलमानच्या अपार्टमेंटमध्ये शिरला तरुण अन्…
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अचानक प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची नजर चुकवत कारच्या...
अंकिता लोखंडे प्रेग्नेंट आहे? पती विकीसोबत मालदीव व्हॅकेशनमधील अंकिताचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा
कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेणारी डॉक्टर कोण? जी अभिनेत्रींनाही देते टक्कर
90s च्या जमान्यात जायचंय? तर हे Whatsapp चं नवं Walkie Talkie फिचर वापरा!
अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा, संजय राऊत यांचा आरोप
सर्व मर्यादा ओलांडल्या! तामिळनाडूतील छापेमारीवर सर्वोच्च न्यायालयाचे ईडीवर कडक शब्दात ताशेरे
Arjun Khotkar : शासकीय विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत काय कांड?; त्या आरोपांवर मंत्री अर्जुनराव खोतकर यांची पहिली प्रतिक्रिया