अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण, आजपासून होणार ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण, आजपासून होणार ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन दोन वर्ष उलटली तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव करण्यात आले नव्हते. त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून सतत पाठपुरावा केला जात होता. त्यासाठी ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी रेल्वेकडून नाव बदलाचा जीआर काढण्यात आला. या जीआरनुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आले आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. ”पाठपुराव्याला यश…! अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण – आता ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’. उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता अधिकृतपणे ‘धाराशिव’. हा केवळ एक बदल नाही, तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे! असे त्यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खरीप हंगामाच्या बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल; काही अधिकाऱ्यांच्या डुलक्या, अजित पवारांनी सर्वांना झापले खरीप हंगामाच्या बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल; काही अधिकाऱ्यांच्या डुलक्या, अजित पवारांनी सर्वांना झापले
राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल होते, तर काही अधिकारी चक्क...
जेईईचा सॅम्पल रिझल्ट दिला जात नाही, एनटीएचा खुलासा
100 वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्याची नोटीस, भाजपचे हिंदुत्व पहा कसे बेगडी; आदित्य ठाकरे यांचा ठिय्या
ई-चलानविरोधातील तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळल्या, मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत 1.81 लाख तक्रारी; आरटीआयमधून माहिती उघडकीस
नाशिकच्या भाताचा गुजरातमध्ये काळाबाजार, पुरवठा खात्याचा घोटाळा उघड; राईस मिल मालकावर गुन्हा
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन