झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी ठार

झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी ठार

झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी ठार झाला आहे. मनिष यादव असे ठार केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. तर कुंदन खेरनार या माओवाद्याला अटक करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली.

गुप्त माहितीच्या आधारे रविवारी रात्री उशिरा मौहादंड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दौना येथील जंगलात सुरक्षा दलाने सर्च मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यात मनीष यादव सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. कुंदन खेरवार या माओवादीला अटक केल्याचे पलामूचे उपमहानिरीक्षक वायएस रमेश यांनी सांगितले.

लातेहारमध्ये 10 लाख रुपयांचे बक्षीस असलेला झारखंड जनमुक्ती परिषद (जेजेएमपी) गटाचा प्रमुख पप्पू लोहरा याच्यासह जिल्ह्यात आणखी दोन माओवाद्यांना ठार केल्यानंतर दोनच दिवसांत ही कारवाई करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – जे जे रुग्णालयाच्या वसतिगृहात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले Mumbai News – जे जे रुग्णालयाच्या वसतिगृहात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले
सर जे जे रुग्णालयातील वसतिगृहात आर्थिक आणि शैक्षणिक तणावातून एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहन रामफेर प्रजापती...
Nagpur News – प्रेमभंगातून प्रेयसीने जीव दिला, प्रियकराचा चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न
Mumbai News – मोबाईल चोरीच्या संशयातून मित्रांकडून मित्रावर चाकूहल्ला, आरोपी अटक
खराब वातावरणामुळे शुभांशू शुक्ला यांची अंतराळ झेप टळली,आता ‘या’ दिवशी झेपावणार
सतत ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो? तुम्ही पण करतायत तिच चूक? तज्ज्ञ काय सांगतात?
मुंब्रा रेल्वे अपघातात बुलढाण्यातील जवानाचा मृत्यू
मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही, धारावीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल