Breaking- मध्य रेल्वे लोकलसेवा ठप्प!
मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे, मध्यरेल्वेची लोकलसेवा आता ठप्प झाली आहे. सायन रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूकीवर मोठा परीणाम झालेला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भायखळा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अप डाऊन हार्बर मार्गावरील रेल्वेलाईन ठप्प झालेली आहे. मुंबईत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 134 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
मंत्रालय परीसरातही पाणी साचले आहे. तसेच मुंबईत पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. मुंबईस उपनगरामध्ये सध्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर मोठा परीणाम झालेला आहे.
सविस्तर वृत्त लवकर…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List