फडणवीस सरकारची हुकूमशाही, शासनाच्या निर्णयांवर टीका करण्यास कर्मचाऱ्यांना बंदी

फडणवीस सरकारची हुकूमशाही, शासनाच्या निर्णयांवर टीका करण्यास कर्मचाऱ्यांना बंदी

सरकारच्या निर्णयांवर मत व्यक्त करण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. कर्मचाऱयांनी सोशल मीडिया वा अन्य माध्यमांतून सरकारी निर्णयांवर मत मांडले किंवा आक्षेप घेतला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी सूचनावजा धमकी राज्य शासनाच्या अभियोग संचालनालयाने दिली आहे. ही हुकूमशाही असल्याची प्रतिक्रिया सरकारी कर्मचाऱयांमध्ये उमटली आहे.

राज्यघटनेने देशातील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, परंतु भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्ताधारी बनल्यापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. शासनाच्या अभियोग संचालनालयाचे संचालक अशोककुमार भिल्लारे यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून त्यात कर्मचाऱयांना सरकारविरुद्ध बोलण्यास बंदी घालणारे स्पष्ट आदेश दिले आहेत.

अभियोग संचालनालयाचा फतवा

शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांवर फेसबुक, यूटय़ूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप, लिंक्डइन यांसारख्या सोशल मीडियावर संचालनालयातील कर्मचारी मत, टीका अथवा आक्षेप नोंदवत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 शी विसंगत असून त्यांनी शासकीय कामकाजामध्ये सचोटी, कर्तव्यपरायणता इत्यादी राखण्यासंबंधीच्या त्यांच्या कर्तव्यांमध्ये बाधा आणणारी आहे. त्यामुळे अशी कृती करणाऱ्या कर्मचाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे भिल्लारे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

शिस्तीच्या नावाखाली आवाज दाबला जातोय – हर्षवर्धन सपकाळ

सरकारने वाट्टेल ते करायचे, भ्रष्टाचार आणि लूट करायची पण त्याविरोधात कुणी बोलायचे नाही ही महायुती सरकारची दडपशाही आहे, शिस्तीच्या नावाखाली आवाज दाबला जातोय, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. लोकशाही केवळ मतदानात नाही तर मत मांडण्यातही असते, असे सपकाळ म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला आहे....
Crime News – जीन्स घातली म्हणून मोठा भाऊ संतापला, लहान भावाचा गळा चिरला
चंद्रपूरमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू, तीन जण जखमी
ऑपरेशन सिंदूरवरून टीका करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थिनीला अटक, न्यायालयाने महायुती सरकारला फटकारले
पॉवर नॅप म्हणजे काय, आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घ्या
या लोकांनी आहारात चुकूनही अंडी खाऊ नयेत, वाचा
IPL 2025 – Operation Sindoor च्या विजयाचे हिरो फायनलमध्ये राहणार उपस्थित