चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच बदलत्या जीवनशैलीत लोकं त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वाढत्या वजनाच्या समस्येसोबतच हृदयरोग आणि मधुमेहाच्या समस्याही दिसून येत आहेत. यामागील कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की जर तुमचा आहार आणि दिनचर्या दोन्ही निरोगी असतील तर अनेक आजारांचा धोका आपोआप कमी होतो.

त्यातच मधुमेहाबद्दल बोलायचे झाले तर, ज्यांना हा आजार आहे त्यांना गोड पदार्थ खाण्यास सक्त मनाई असते. याशिवाय अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न आणि पॅक केलेले ज्यूस सेवन करता येत नाही. पण अशी काही फळे आहेत जी मधुमेह असला तरीही आरामात खाऊ शकता. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहोत जे मधुमेही रूग्ण देखील सहज खाऊ शकता. चला सविस्तर जाणून घेऊयात –

जांभूळ

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ हे फळ वरदानापेक्षा कमी नाही. त्यात जाम्बोलिन आणि जाम्बुसिन नावाचे संयुगे चांगल्या प्रमाणात असतात. ते केवळ रक्तातील साखर नियंत्रित करत नाही तर इन्सुलिनची कार्यक्षमता देखील सुधारते. तुम्ही दररोज एक वाटी हे फळ खाऊ शकता.

पेरू

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पेरू खूप फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ते खाल्ल्याने मधुमेही रूग्णांचे पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे जास्त खाणे टाळता येते . यामुळे वजनही कमी होतेच, पण त्याचवेळी पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर देखील नियंत्रित ठेवता येते. तसेच पेरूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

पपई

मधुमेही रुग्णांनी पपई खावी असे म्हटले जाते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून रोखतात. पपईमध्ये कॅलरीज देखील कमी असतात. यामुळे मधुमेही रुग्णांना त्यांचे वजन समतोल राखणे सोपे होते.

बेरी

मधुमेहाच्या रुग्णांनी ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि चेरी सारख्या बेरीजचे सेवन अवश्य करावे. हे एक प्रकारचे सुपरफूड आहेत. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. जे मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल
जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचे शरीर जाळले जाते किंवा पुरले जाते . अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल...
अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी, संजय राऊत यांचा घणाघात
अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय पण मोदी होऊ देणार नाहीत, संजय राऊत यांचा मोठा दावा
हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
पालखीतील वारकऱ्यांसाठी ‘कळण्याची भाकरी व ठेच्याचा बेत, माळीपेठ वासीयांचा 20 वर्षांचा स्तुत्य उपक्रम
महायुतीचे सरकार विश्वासघातकी; शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले : जयश्री शेळके
देवळावर डल्ला… दानपेटी, घंटा, समया चोरणे हाच त्याचा धंदा; रेवदंड्यातील चोरट्याला अटक