मिंधे-भाजप मंत्र्यांमध्ये ‘पत्रयुद्ध’; मिंध्यांनो लक्षात ठेवा गाठ कुणाशी आहे

मिंधे-भाजप मंत्र्यांमध्ये ‘पत्रयुद्ध’; मिंध्यांनो लक्षात ठेवा गाठ कुणाशी आहे

महायुती सरकारमधील मिंधे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील ‘पत्रयुद्ध’ गाजत आहे. मात्र, राज्यमंत्री मिसाळ यांनी शिरसाट यांना उत्तरादाखल लिहिलेले पत्र म्हणजे लक्षात ठेवा गाठ कुणाशी आहे अशा आशयाचे असल्याची जोरदार चर्चा आहे.

राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तरादाखल दिलेल्या पत्रात पहिलाच मुद्दा ‘सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. त्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही’ अशी सणसणीत चपराक देणारा आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मिसाळ यांचे पत्र हे फक्त प्रत्युत्तर नाही आपली गाठ कुणाशी आहे या सेना आणि राष्ट्रवादी दोघांना हा धडा आहे. अजुन साडेचार वर्ष बाकी आहेत, अशीही प्रतिक्रिया उमटली.

मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या 150 दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब आपल्याला अवगत असेलच. हे पाहता खात्याची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे व ती माझी जबाबदारी सुद्धा आहे. त्यामुळे या बैठका अनिवार्य असल्याने त्यासाठी आपली पूर्व परवानगी आवश्यक वाटत नाही, असे माधुरी मिसाळ यांनी पत्रात म्हटले आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्याच खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात अधिकाराचा मर्यादाभंग झाल्याचा वादंग सुरू झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यातील खराडीत मध्यरात्री रेव्ह पार्टी, गुन्हे शाखेचा छापा; बड्या नेत्याचा जावई, तरुणींसह सात जण ताब्यात पुण्यातील खराडीत मध्यरात्री रेव्ह पार्टी, गुन्हे शाखेचा छापा; बड्या नेत्याचा जावई, तरुणींसह सात जण ताब्यात
पुणे शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडीतील एका खासगी रेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी...
ब्रेक फेल झालेल्या भरधाव कंटेनरने दोन किलोमीटरपर्यंत 20 गाड्यांना चिरडत नेले
सचिन गुंजाळ नवी मुंबई गुन्हे शाखेचे नवे उपायुक्त
धामणी, कवडास, वांद्री प्रकल्पांचे दरवाजे उघडले, तीन धरणे ओव्हरफ्लो; पालघरची पाणी चिंता मिटली
गुगल मॅपच्या नादी लागू नका… नकाशाच्या दिशेने चाललेली कार खाडीत कोसळली
श्रावणी सोमवार…भोलेनाथाची पूजा…शिवामूठ…जाणून घ्या माहिती
Uddhav Thackeray महाराष्ट्र धर्माचे रक्षणकर्ते