दुबेंची तंतरली… महाराष्ट्र सदनात ‘प्रसाद’ मिळेल या भीतीने कार्यक्रमाला दांडी

दुबेंची तंतरली… महाराष्ट्र सदनात ‘प्रसाद’ मिळेल या भीतीने कार्यक्रमाला दांडी

मराठी माणसाला ‘पटक पटक के मारेंगे’ ची भाषा करणारे भाजपचे मस्तवाल खासदार निशिकांत दुबे यांनी सध्या मराठी माणसाचा चांगलाच धसका घेतला आहे. नवीन महाराष्ट्र सदनात आज पार पडलेल्या संसदरत्न पुरस्कार सोहळ्याला ‘पुरस्कारार्थी’ असूनही दुबेंनी दांडी मारली. मराठी माणसाला फुकाच्या धमक्या देणाऱ्या दुबेंचीच प्रत्यक्षात तंतरल्याचे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

या वर्षीचा संसदरत्न पुरस्कार सोहळा नवीन महाराष्ट्र सदनात होणार असल्यामुळे मराठी भाषेबद्दल व मराठी माणसांबद्दल गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबे यांनी घाबरून या कार्यक्रमालाच दांडी मारली. आज सतरा जणांना हा पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमात मराठी लोकांनी जाब विचारला असता तर त्यांना पळताभुई थोडी झाली असती. त्यामुळे पटक पटक के मारेंगेची भाषा करणारे निशिकांत दुबे घाबरून घरात दडून बसले.

दुबे सावध का झाले?

काही दिवसांपूर्वीच संसदेच्या लॉबीत महाराष्ट्रातील वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव व प्रतिभा धानोरकर या महिला खासदारांनी दुबे यांना, तुम्ही मराठी माणसाबद्दल असे कसे बोलू शकता, असा सवाल केला होता. त्यावेळीही दुबेंना तोंड लपवून जावे लागले होते. या खासदारांपैकी संसदरत्न मिळालेल्या वर्षा गायकवाड यांचीही महाराष्ट्र सदनात भेट झाली असती तसेच शिवसैनिक व महाराष्ट्रप्रेमी मंडळी भेटली असती. त्यांच्याकडून प्रसाद मिळाला असता याचा अंदाज आल्यानेच दुबेने कार्यक्रमाला दडी मारली.

…आणि रविकिशन मराठी बोलू लागले

याच कार्यक्रमात गोरखपूरचे खासदार, सिनेअभिनेते असलेल्या रविकिशन यांनी मात्र, मराठीत बोला असा आग्रह मीडियाच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर मराठीत पत्रकारांशी संवाद साधला. रविकिशन यांची फिल्मी कारकिर्द मुंबईतच घडली. ते गोरेगावात राहतात. रविकिशन यांनी आढेवेढे न घेता आपल्याला मराठीत बोलता येते हेही यावेळी सप्रमाण दाखवून दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल
जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचे शरीर जाळले जाते किंवा पुरले जाते . अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल...
अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी, संजय राऊत यांचा घणाघात
अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय पण मोदी होऊ देणार नाहीत, संजय राऊत यांचा मोठा दावा
हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
पालखीतील वारकऱ्यांसाठी ‘कळण्याची भाकरी व ठेच्याचा बेत, माळीपेठ वासीयांचा 20 वर्षांचा स्तुत्य उपक्रम
महायुतीचे सरकार विश्वासघातकी; शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले : जयश्री शेळके
देवळावर डल्ला… दानपेटी, घंटा, समया चोरणे हाच त्याचा धंदा; रेवदंड्यातील चोरट्याला अटक