हिंदुस्थानची लोकसंख्या किती? लवकरच कळणार, केंद्र सरकारने काढली जनगणनेची अधिसूचना

हिंदुस्थानची लोकसंख्या किती? लवकरच कळणार, केंद्र सरकारने काढली जनगणनेची अधिसूचना

हिंदुस्थानची एकूण लोकसंख्या किती, महिला किती, पुरूष किती, कुठल्या धर्माची, कुठल्या जातींची किती लोकसंख्या आहे याची उत्तरं लवकरचं मिळणार आहे. कारण केंद्र सरकारने जनगणेनची अधिसूचना जारी केली आहे. 2011 साली शेवटची जनगणना झाली होती. त्यानंतर 2021 साली ही गणना होणार होती. परंतु कोरोनामुळे ही गणना व्हायला उशीर झाला. आता या वर्षीपासून या गणनेच्या प्रक्रियेला सुरूवात होत आहे.

ही जनगणना अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे, कारण यात नागरिकांना एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा पर्याय मिळणार आहे. तो म्हणजे सेल्फ एन्युमरेशनचा. यामध्ये नागरिक स्वतःहून आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकतील.

गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला होता. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2027 मध्ये होणारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवली जाणार आहे. यामध्ये डेटा सुरक्षेसाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत, जेणेकरून माहिती संकलन आणि पाठविण्याची प्रक्रिया सुरक्षित राहील.

जनगणना अधिनियमात 2022 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणानंतर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने स्वतःची माहिती भरता येणार आहे. ही भारताची पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे.

यासाठी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (ORGI) ने Self Enumeration Portal नावाचे वेब पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक आपल्या घरातील सर्व सदस्यांची माहिती पाहू शकतील आणि त्यात हवे ते बदल करू करू शकतील. तसेच जनगणना सुरू होण्याच्या ठरलेल्या तारखेच्या काही दिवस आधी हे पोर्टल बंद करण्यात येईल, जेणेकरून फायनल डेटा एकत्र करता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात
आजकालच्या धावपळीच्या जगात सगळ्या कामांसाठी वेळ देणे जरा कठीणच असते. त्यामुळे मल्टीटास्कींग हाच एक पर्याय असतो. त्यात महिलांना जर घरातील...
शरीरात कफ दोष का वाढतो? पतंजलीचा हा नामी उपाय करून पाहा
Ratnagiri News – गोळवली येथे मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन; शेती बागायतीला मोठा फटका, सुपारीची 80 झाडे जमीनदोस्त
Rain Update – पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 82 जणांचा मृत्यू, सरकार अजूनही आकडे लपवतेय – अखिलेश यादव
Women’s World Cup 2025 – पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे होणार टक्कर? ICC ने जाहीर केलं संपूर्ण वेळापत्रक
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर