ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचे आज निधन झाले ते 84 वर्षाचे होते. निरपेक्ष, लढाऊ, स्वयंसेवक पत्रकार आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची समाजात ओळख होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’ मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यानंतर इंग्रजी भाषेतील ’मिड डे’ मध्ये राजकीय संपादक या पदावर त्यांनी काम केले. तिथे  त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. अरविंद कुलकर्णी यांनी काही वर्षे साप्ताहिक विवेक, मासिक धर्मभास्करचे  संपादनही केले होते. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेचे मुंबईतील ब्युरोप्रमुख म्हणूनही त्यांनी लक्षणीय काम केले तसेच अनेक तरुणांना राष्ट्रीय विचाराच्या पत्रकारितेचे धडे त्यांनी दिले. जवळपास दशकभर पु. भा. भावे स्मृतिसमितीचे कार्यवाह म्हणून काम केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ
कधी तांत्रिक बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी पावसामुळे मध्य रेल्वे रखडते. आता मेट्रोलाही मध्य रेल्वेची लागण झाल्याचे दिसते....
Air India Plane Crash नंतर 33 पैकी 22 ड्रिमलायनर विमानांची तपासणी पूर्ण, महत्त्वाची माहिती आली समोर
प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा 27 जूनपासून सुरू होणार; 9 दिवस चालणार सोहळा
अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परत पाठवण्यासाठी इराणचा मोठा निर्णय!
हिंदुस्थानची लोकसंख्या किती? लवकरच कळणार, केंद्र सरकारने काढली जनगणनेची अधिसूचना
नो टेन्शन!! मानेवरील काळे डाग आता होतील झटक्यात दूर, करा हे घरगुती उपाय
मावळ दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा – संजय राऊत