कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 82 जणांचा मृत्यू, सरकार अजूनही आकडे लपवतेय – अखिलेश यादव

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 82 जणांचा मृत्यू, सरकार अजूनही आकडे लपवतेय – अखिलेश यादव

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 82 जणांचा मृत्यू, सरकार अजूनही आकडे लपवतेय, अशी टीका समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर केली आहे. त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सरकारला लक्ष्य केलं आहे. लखनऊ येथील समाजवादी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेच्या समस्या वाढत असल्याचा आरोप केला.

अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत की, “भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या असून, सामान्य कुटुंबांना आपल्या मुलींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे.” ते म्हणाले की, बेरोजगारीमुळे तरुणांचे भविष्य अंधारात आहे आणि सरकारकडे यावर कोणताही ठोस उपाय नाही. विकसित भारताचा दावा करणारी ही सरकार जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असे ते म्हणाले.

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, कुंभमेळ्यात 82 जणांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आले आहेत. पण सरकार अजूनही आकडे लपवत आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृत्युंचे सत्य बाहेर आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना रोख रक्कम दिली जात होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कांदिवली आणि देवनार येथील शाळांमध्ये धमकीचे ईमेल कांदिवली आणि देवनार येथील शाळांमध्ये धमकीचे ईमेल
मुंबईत धमकीचे मेल आणि फोन यायचे सत्र सुरूच आहे. आता कांदीवली आणि गोवंडी येथील आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी...
हिंदुस्थान-पाकिस्तान श्रीलंकेमध्ये भिडणार, महिला वन डे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; हिंदुस्थानमध्ये 30 सप्टेंबरपासून रंगणार थरार
टिळक नगर येथील हुक्का पार्लरवर छापा; गुन्हे शाखेची कारवाई
बनावट अकाऊंट उघडून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक
Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली घटना
मधुमेह होण्यापूर्वी बहुतेक रुग्णांमध्ये ही तीन लक्षणे दिसतातच
‘रेडी टू ईट फूड’ खाणे चांगले आहे की धोकादायक? यात मिसळल्या जाणाऱ्या या गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो का?