Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी आणि कोदवली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. पुरामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 113.54 मिमी पावसाची नोंद झाली.

अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला वेढले आहे. शहरातील बहुतांश भागामध्ये पुराचे पाणी घुसले. ग्रामीण भागातील शिळ-गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यातच अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसिलदार विकास गंबरे, नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी जवाहर चौकामध्ये पूरस्थितीची पाहणी करून लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. तर, प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

दापोली ते दाभोळ रस्त्यावर सकाळी झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. शहरानजीकचा शीळ-गोठणेदोनिवडे रस्ताही पुराच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणोदोनिवडे, आंगले, दोनिवडे आदी गावांमधील भातशेतीही पुराच्या पाण्याखाली गेली होती.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 113.54 मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड – 66.50 मिमी, खेड – 107.28 मिमी, दापोली – 96.14 मिमी, चिपळूण – 128.33 मिमी, गुहागर – 136.80 मिमी, संगमेश्वर – 129.50 मिमी, रत्नागिरी – 99.77 मिमी ,लांजा – 139.60 मिमी राजापूर – 118.00 मिमी पाऊस पडला.

दोन नद्यांनी गाठली इशारा पातळी

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी गाठली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली घटना Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली घटना
इमारतीचे बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीत सोमवारी घडली. सोनेलाल प्रसाद असे मयत...
मधुमेह होण्यापूर्वी बहुतेक रुग्णांमध्ये ही तीन लक्षणे दिसतातच
‘रेडी टू ईट फूड’ खाणे चांगले आहे की धोकादायक? यात मिसळल्या जाणाऱ्या या गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो का?
वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प
Beed News – ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार, शेतीतील बांधाच्या वादातून बीडमध्ये धक्कादायक प्रकार
इस्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर केला हल्ला, लाईव्ह शो सोडून अँकरला काढावा लागला पळ
कलिंगडाच्या बियांमध्ये दडला आहे खजिना! पण नेमक्या कशा पद्धतीने खाव्यात ? जाणून घ्या