रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; राजापूरात पूर

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; राजापूरात पूर

गेले तीन दिवस सुरू असलेल्य मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. राजापूरातील अर्जुना नदी आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकात शिरले असून राजापूर बाजारपेठ जलमय झाली आहे. पुराचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जगबुडी नदी, शास्त्री नदी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलाडल्यामुळे जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.जवाहर चौकात आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत राजापूर शहरात 118 मिमी पाऊस पडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधुमेह होण्यापूर्वी बहुतेक रुग्णांमध्ये ही तीन लक्षणे दिसतातच मधुमेह होण्यापूर्वी बहुतेक रुग्णांमध्ये ही तीन लक्षणे दिसतातच
मधुमेह हा जगभरात वेगाने वाढणारा आजार आहे. पूर्वी हा आजार वृद्धापकाळातील आजार मानला जात होता, परंतु गेल्या 10 वर्षांत मुले...
‘रेडी टू ईट फूड’ खाणे चांगले आहे की धोकादायक? यात मिसळल्या जाणाऱ्या या गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो का?
वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प
Beed News – ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार, शेतीतील बांधाच्या वादातून बीडमध्ये धक्कादायक प्रकार
इस्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर केला हल्ला, लाईव्ह शो सोडून अँकरला काढावा लागला पळ
कलिंगडाच्या बियांमध्ये दडला आहे खजिना! पण नेमक्या कशा पद्धतीने खाव्यात ? जाणून घ्या
टेरर फंडिंगशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत, पहलगाम हल्ल्यावर FATF ने पाकिस्तानला फटकारले