Kedarnath chopper crash- ‘अपघाताला भाजपची हवाई सेवांसंदर्भातील भयंकर धोरणे कारणीभूत’, काँग्रेसचा आरोप

Kedarnath chopper crash- ‘अपघाताला भाजपची हवाई सेवांसंदर्भातील भयंकर धोरणे कारणीभूत’, काँग्रेसचा आरोप

उत्तराखंड काँग्रेसने रविवारी केदारनाथजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताला ‘अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद’ असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अपघातासाठी भाजप सरकारच्या ‘हवाई सेवा संदर्भातील निष्काळजी व हलगर्जीपणा’ जबाबदार धरले आहे. (Congress blames BJP’s lax air safety rules for Kedarnath chopper crash | Chardham Yatra helicopter tragedy).

रविवारी सकाळी, खराब दृश्यमानतेमुळे केदारनाथ मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन निघालेलं एक हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला.

चारधाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून, त्या मार्गावर आतापर्यंत पाचवे हेलिकॉप्टर अपघात घडला आहे.

उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन) सूर्यकांत धस्माना यांनी एका पत्रकात सांगितले की, ‘राज्यात चारधाम यात्रा सुरू होऊन फक्त एक महिना आणि काही दिवस झाले आहेत, पण आतापर्यंत पाच हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. आजच्या अपघातात काही जणांचे प्राण गेले ही अतिशय दुःखद आणि गंभीर बाब आहे. या सगळ्याला उत्तराखंडातील भाजप सरकारचे निष्काळजी आणि ढिसाळ हवाई सेवा धोरणे पूर्णतः जबाबदार आहेत.”

धस्माना यांनी सांगितले की, काँग्रेसने राज्य सरकारकडे हवाई वाहतूक नियंत्रण (Air Traffic Control – ATC) नियम काटेकोरपणे राबवण्याची मागणी केली होती. मात्र, पैसे कमावण्याच्या घाईत काही हेलिकॉप्टर कंपन्या नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी दावा केला की, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरसह आणखी दोन हेलिकॉप्टर त्याच ठिकाणाहून उड्डाणासाठी तयार होती, मात्र अपघात होताच ती दोन्ही परत आली.

धस्माना यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हेलिसेवांबाबत दिलेल्या आदेशांची यामार्गावर सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होत नाही.

‘मुख्यमंत्र्यांनी खराब हवामानात हेलिकॉप्टर न उडवण्याबाबत दोन दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्यानंतरही हेलिकॉप्टर सेवा सुरू ठेवली जात आहे, यावरून स्पष्ट होते की काही कंपन्या केवळ पैसे कमवण्यासाठी प्रवाशांचे प्राण धोक्यात घालायला तयार आहेत’, असेही धस्माना म्हणाले.

काँग्रेसने मागणी केली की, राज्य सरकारने हवाई वाहतूक नियंत्रण नियम कठोरपणे लागू करावेत आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी.

तसेच हेलिकॉप्टरमधील स्वच्छतेचा ऑडिट व इतर सुरक्षा निकषही काटेकोरपणे पाळले जावेत, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;