Kedarnath chopper crash- ‘अपघाताला भाजपची हवाई सेवांसंदर्भातील भयंकर धोरणे कारणीभूत’, काँग्रेसचा आरोप

Kedarnath chopper crash- ‘अपघाताला भाजपची हवाई सेवांसंदर्भातील भयंकर धोरणे कारणीभूत’, काँग्रेसचा आरोप

उत्तराखंड काँग्रेसने रविवारी केदारनाथजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताला ‘अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद’ असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अपघातासाठी भाजप सरकारच्या ‘हवाई सेवा संदर्भातील निष्काळजी व हलगर्जीपणा’ जबाबदार धरले आहे. (Congress blames BJP’s lax air safety rules for Kedarnath chopper crash | Chardham Yatra helicopter tragedy).

रविवारी सकाळी, खराब दृश्यमानतेमुळे केदारनाथ मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन निघालेलं एक हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला.

चारधाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून, त्या मार्गावर आतापर्यंत पाचवे हेलिकॉप्टर अपघात घडला आहे.

उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन) सूर्यकांत धस्माना यांनी एका पत्रकात सांगितले की, ‘राज्यात चारधाम यात्रा सुरू होऊन फक्त एक महिना आणि काही दिवस झाले आहेत, पण आतापर्यंत पाच हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. आजच्या अपघातात काही जणांचे प्राण गेले ही अतिशय दुःखद आणि गंभीर बाब आहे. या सगळ्याला उत्तराखंडातील भाजप सरकारचे निष्काळजी आणि ढिसाळ हवाई सेवा धोरणे पूर्णतः जबाबदार आहेत.”

धस्माना यांनी सांगितले की, काँग्रेसने राज्य सरकारकडे हवाई वाहतूक नियंत्रण (Air Traffic Control – ATC) नियम काटेकोरपणे राबवण्याची मागणी केली होती. मात्र, पैसे कमावण्याच्या घाईत काही हेलिकॉप्टर कंपन्या नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी दावा केला की, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरसह आणखी दोन हेलिकॉप्टर त्याच ठिकाणाहून उड्डाणासाठी तयार होती, मात्र अपघात होताच ती दोन्ही परत आली.

धस्माना यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हेलिसेवांबाबत दिलेल्या आदेशांची यामार्गावर सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होत नाही.

‘मुख्यमंत्र्यांनी खराब हवामानात हेलिकॉप्टर न उडवण्याबाबत दोन दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्यानंतरही हेलिकॉप्टर सेवा सुरू ठेवली जात आहे, यावरून स्पष्ट होते की काही कंपन्या केवळ पैसे कमवण्यासाठी प्रवाशांचे प्राण धोक्यात घालायला तयार आहेत’, असेही धस्माना म्हणाले.

काँग्रेसने मागणी केली की, राज्य सरकारने हवाई वाहतूक नियंत्रण नियम कठोरपणे लागू करावेत आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी.

तसेच हेलिकॉप्टरमधील स्वच्छतेचा ऑडिट व इतर सुरक्षा निकषही काटेकोरपणे पाळले जावेत, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात
आजकालच्या धावपळीच्या जगात सगळ्या कामांसाठी वेळ देणे जरा कठीणच असते. त्यामुळे मल्टीटास्कींग हाच एक पर्याय असतो. त्यात महिलांना जर घरातील...
शरीरात कफ दोष का वाढतो? पतंजलीचा हा नामी उपाय करून पाहा
Ratnagiri News – गोळवली येथे मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन; शेती बागायतीला मोठा फटका, सुपारीची 80 झाडे जमीनदोस्त
Rain Update – पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 82 जणांचा मृत्यू, सरकार अजूनही आकडे लपवतेय – अखिलेश यादव
Women’s World Cup 2025 – पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे होणार टक्कर? ICC ने जाहीर केलं संपूर्ण वेळापत्रक
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर