एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाड; तासभर रखडले टेक ऑफ, गाझियाबादच्या विमानतळावर प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाड; तासभर रखडले टेक ऑफ, गाझियाबादच्या विमानतळावर प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणे सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ड्रीमलायनर विमान कोसळल्याच्या घटनेनंतरही विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरू राहिले आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते विमान तासभर विमानतळावरच रखडले. उड्डाणापूर्वी बिघाड निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला. तांत्रिक बिघाडानंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

एअर इंडिया एक्प्रेसचे विमान हिंडन विमानतळावरून कोलकाताच्या दिशेने उड्डाण घेणार होते, मात्र विमानाच्या उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाड आढळून आला. विमान उड्डाण करण्याच्या शेवटच्या क्षणी कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड दिसून आला. त्यानंतर बिघाडाच्या दुरुस्तीसाठी अभियंत्यांना पाचारण करण्यात आले, परंतु दुरुस्ती करण्यास तासभरापेक्षा अधिक वेळ गेल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. यावेळी एअर इंडिया प्रशासनाने प्रवाशांना तिकीट रद्द करून पूर्ण रक्कम परत घेण्याची ऑफर दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शरीराचा हा भाग सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो; उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहितीये का? शरीराचा हा भाग सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो; उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहितीये का?
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता धोकादायक मानली जाते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधेदुखीची समस्या वाढते. एवढंच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती...
उन्हाळ्यात नारळाचं तेल वापरणं खरंच योग्य? बहुतांश लोकांना माहित नाही या नैसर्गिक उपायाचे फायदे!
Kitchen Tips- हे पदार्थ कधीही नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत, वाचा
मुंबईत पूरही नाही येणार आणि लाखो लिटर पाणीही मिळणार, पालिका उभारणार नवीन पंपिंग स्टेशन
Kitchen Cleaning Tips: जळलेली स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा सविस्तर
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; राजापूरात पूर
मुसळधार पावसाची बॅटिंग सुरुच; राजवाडीतील गरम पाण्याच्या कुंडांना पुराच्या पाण्याने वेढले