रहदारी – वाढत्या वाहनसंख्येवर नियंत्रण

रहदारी – वाढत्या वाहनसंख्येवर नियंत्रण

>> वैभव पाटील

मुंबई व उपनगरांमध्ये वाढलेली भरमसाट वाहने व त्याचा रस्ते वाहतुकीवर होत असलेला विपरीत परिणाम भविष्यातील सर्वात मोठी समस्या आहे. वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने बहुतांश ठिकाणी वाहने थेट रस्त्यावरच उभी केली जातात. हीच वाहने अनेकदा वाहतुकीस अडथळा ठरतात व टाफिकच्या समस्येस कारणीभूत ठरत असतात. बाजारपेठा, मॉल, विविध कार्यालये अशा बहुतांश ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्थाच नाही. या पार्श्वभूमीवर ‘नो पार्किंग’चे नियम अधिक कडक करणे गरजेचेच आहे. मात्र मूळ समस्येसाठी हा नियम कायमस्वरूपी पर्याय ठरू शकत नाही. मुंबईमध्ये अमर्यादित संख्येत वाढत चाललेली वाहनसंख्या हेच मूळ कारण वाहतुकीच्या सततच्या उडणाऱया बोजवाऱयास आहे. मुंबईतील आज एकही मुख्य रस्ता असा नाही जो वाहनांनी पूर्णपणे व्यापलेला नाही. दर दिवशी सरासरी 40 लाख वाहने मुंबईच्या रस्त्यावर धावत असतात. यात दुचाकी व कारची संख्या सर्वाधिक आहे. या वाहनांमुळे रस्त्यावर धावणारी वाहने साधारणतः 20 किलोमीटर प्रति ताशी वेगापेक्षा अधिक वेगाने धावत नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे. सकाळ-संध्याकाळच्या ट्राफिकच्या वेळी तर हा वेग ताशी 10 किमीपेक्षा कमी असतो. ट्राफिकच्या बाबतीत मुंबई जगातील सर्वाधिक वाहतुकीची समस्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. रहदारीच्या समस्येत मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. वाढती वाहनसंख्या आज मुंबईसह सर्वच शहरांची डोकेदुखी झाली आहे. रस्त्यावरील रहदारीची समस्या, प्रदूषण, पार्किंगची समस्या यामुळे कुठलेही शहर आज सुसह्य जीवनासाठी अनुकूल राहिलेले नाही. दररोज हजारोंच्या संख्येने वाहने खरेदी व नोंदणी होत असतील तर वाहनांचा हा कर्दनकाळ किती मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरत आहे हे ध्यानात येईल. वाहनांचा फोफावत चाललेला हा भस्मासूर शहरे गिळंकृत करू लागला आहे. एकीकडे पार्किंगचे नियम कडक करत असताना दररोज रस्त्यावर येणारी नवी वाहने रोखायला हवीत ही बाब कुणाच्याच कशी लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. पार्किंगसाठी जादा दंड आकारून समस्या सुटणार नाही. नव्या वाहनांची नोंदणी करताना नियम अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी वाहतूक विभाग, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय जास्त महत्त्वाचा आहे. निवासी संकुलांमध्ये पार्किंगची जागा उपलब्ध असल्याशिवाय वाहन खरेदीस परवानगी देण्यात येऊ नये. शहरात नवी वाहने दाखल करताना वाहन कंपन्यांवर मर्यादा आणायला हव्यात. पर्यावरणपूरक वाहन निर्मितीवर भर देण्यात यावा जेणेकरून वाढत्या प्रदूषणाला आळा बसू शकेल. प्रतिकुटुंब वाहनांची संख्या निश्चित करावी, जेणेकरून अवास्तव वाहन खरेदी रोखली जाईल. शहरात बहुमजली वाहनतळांसाठी जागा उपलब्ध करण्यात यावी. यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके, बाजारपेठा अशी ठिकाणे निवडावी. एकंदरीत वाहन पार्किंगसाठीचे नियम कडक करण्याऐवजी वाहनसंख्या कमी करण्यावर भर दिला तर वाहतूक कोंडी व रहदारीच्या समस्या उद्भवणार नाही. आगामी काळात शहरी जीवन सुसह्य ठेवायचे असेल तर वाढती वाहनसंख्या रोखणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने उपाययोजना आखायला हव्यात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसी किती तापमानावर ठेवावा? जेणेकरून सर्दी-खोकला होणार नाही अन् वीज बिलही कमी येईल एसी किती तापमानावर ठेवावा? जेणेकरून सर्दी-खोकला होणार नाही अन् वीज बिलही कमी येईल
आता जवळपास सर्वांच्याच घरी एसी असतोच. कारण उन्हाळ्यात तर एअर कंडिशनरची थंड हवा वरदानापेक्षा कमी नसते. पण काहीवेळेला सतत एसीच्या...
तुमच्या बेडरूममधून या 3 गोष्टी ताबडतोब फेकून द्या, अन्यथा रात्रीची झोप होऊ शकते खराब
कुंडमळा येथील दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना
Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 2 जणांचा मृत्यू, 32 जखमी, बचावकार्य सुरू
Ratnagiri Rain News – भारजा नदीला पूर, मांदिवली येथील पूल पाण्याखाली; वाहतूक थांबली
Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार? राजकोट किल्ल्यावरील चबुतऱ्याला भगदाड
पवित्र स्नानासाठी नदीत गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील 5 तरुण गोदावरीत बुडाले