Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला
गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. दुपारी 1.38 वाजता हे विमान मेघाणीनगर भागात कोसळले. यात दुर्घटनेत विमानातील 229 प्रवासी आणि 12 क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानातील इंधनामुळे मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत जवळपास सर्वांचाच कोळसा झाला. मृतदेह ओळखूही येत नसल्याने त्यांची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. परंतु, या जीवघेण्या अपघातातून विश्वासकुमार रमेश नावाचा एक प्रवासी सुदैवाने बचावला. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर जखमींसह त्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी विमान अपघातावेळी नक्की काय घडले, ते कसे वाचले, काय चमत्कार झाला याची माहिती दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List