भाजप सरकारचं पितळ उघड, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा आला समोर; जाणून धक्काच बसेल

भाजप सरकारचं पितळ उघड, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा आला समोर; जाणून धक्काच बसेल

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने 37 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. मात्र हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. ‘बीबीसी’च्या पडताळणीत किमान 82 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली. परंतु 26 असे कुटुंब आहेत, ज्यांना प्रत्येकी फक्त 5 लाख रुपये रोख दिले गेले. मात्र त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची नोंद मृतांच्या यादीत करण्यात आली नाही, असं बीबीसीने आपल्या वृत्तात सांगितलं आहे.

प्रयागराजमध्ये कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान 4 हजार हेक्टर क्षेत्रात आयोजित झाला होता. सरकारने या आयोजनासाठी 7 हजार कोटी रुपये खर्च केले आणि 66 कोटी भाविकांनी हजेरी लावल्याचा दावा सरकारने केला. चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले होते की, 29 जानेवारीच्या रात्री 1:10 ते 1:30 दरम्यान संगम नोज येथे ही दुर्घटना घडली. यात 66 भाविक अडकले, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला. यातील 29 जणांची ओळख पटली.

मात्र बीबीसीच्या पडताळणीत 50 हून अधिक जिल्ह्यांतील 100 पेक्षा जास्त कुटुंबांनी आपल्या नातेवाइकांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाल्याचे सांगितले. किमान चार ठिकाणी जीवघेणी चेंगराचेंगरी झाल्याचे पुरावे मिळाले असल्याचं बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अद्याप मृतांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव? लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
    बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा दमदार अभिनय असो किंवा
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत
मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले
श्री विठ्ठल मंदिर परिसरात VIP वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा निर्णय
प्रभागरचनेसाठी पुणे महापालिका घेणार ‘गुगल अर्थ’चा आधार
फक्त गव्हाचे पीठ नाही, तर निरोगी राहण्यासाठी ‘या’ पौष्टिक पिठांचा आहारात समावेश हवाच, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?