मुंबई, ठाण्यासह कोकणाला 13 ते 16 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट, नद्यांना पूर येण्याची शक्यता; काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबई, ठाण्यासह कोकणात येत्या 13 जून ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान कोकणातील नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
कोकणात या तीन दिवसात नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. त्यामुळे नद्यांना पूर येऊन नागरी जीवन विस्कळीत होऊ शकते. तसेच मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यांमधील दृश्यमानता देखील कमी असेल. तसेच दरड कोसळण्याची देखील शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List