Sleeping Tips- रात्री शांत झोप येण्यासाठी, या 5 टिप्स फॉलो करा

Sleeping Tips- रात्री शांत झोप येण्यासाठी, या 5 टिप्स फॉलो करा

आपण निरोगी राहण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहणं हे गरजेचे आहे. म्हणूनच शरीरासोबत मनालाही विश्रांती देणं हे आवश्यक आहे. तरच तुम्ही पूर्णपणे निरोगी राहू शकाल. म्हणूनच आपल्या प्रत्येकाला किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप ही गरजेची आहे. तुम्हाला दररोज व्यवस्थित झोप येत नसेल तर, तुम्ही ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेक आजारांची समस्या उद्भवते. तुम्ही बराच वेळ नीट झोपला नाही तर, चयापचय मंदावू शकते. त्याचबरोबर वजन वाढू लागते, यामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

रात्री उशिरा झोपण्याची सवय असेल तर तुम्ही ती सवय बदलायला हवी. वेळेवर झोपलात आणि रात्री वारंवार जागे होत राहिलात तर याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चांगल्या झोपेसाठी काय करावे ते जाणून घेऊया.

रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी कोमट दूध प्यावे. चिमूटभर हळद घातल्याने चांगली झोप येते. खूप गरम दुध न घेता, दुध कोमट करुन दुधात वेलची, खसखस ​​किंवा बडीशेप घालू शकता. यामुळे झोपही चांगली होते. केशरयुक्त दूध तणाव कमी करते आणि चांगली झोप येण्यास मदत करते.

 

तुम्हाला तुमच्या झोपेची पद्धत सुधारायची असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी बेडवर काही सोपी योगासन करू शकता. यामुळे आपले मन शांत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

बऱ्याच वेळा थकलेले असूनही आपल्याला झोप येत नाही. अशा परिस्थितीत पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास, तुम्हाला खूप आराम वाटेल. पायाखाली उशी घेऊन झोपा आणि उशीशिवाय डोके सरळ ठेवा. तुम्ही आरामात त्यामुळे झोपू शकाल.

तुमच्या झोपेच्या वेळा निश्चित करा, दररोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवावे. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गाढ झोप येण्यास मदत होते. रात्रीचे जेवण 7-8 वाजता केले तर वजनही नियंत्रणात राहते.

रात्री जेवणानंतर, काही मिनिटे वज्रासनात बसावे किंवा 15 ते 20 मिनिटे शतपावली करावी.

संबंधित बातम्या- रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्याचे महत्त्व, वाचा सविस्तर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम, प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम, प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 प्रभाग कायम राहणार आहेत.निवडणूक आयोगाने आज प्रभागरचनेबाबत जारी केलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागांमध्येच घेतल्या...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना संधी द्या – शरद पवार
एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आषाढी यात्रेतील गर्दीवर नियंत्रण आणणार, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची माहिती
बीडमध्ये पोलिसाांच्या कार्याला सलाम! शेकडो वृद्धांना पाठीवर घेऊन कथास्थळापर्यंत पोहोचवले
Ratnagiri News – दापोली तालुक्यात केळशी सजाचे तलाठी 20 हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात
तळीरामांच्या खिशाला कात्री! दारुवरील उत्पादन शुल्कात वाढ
भाजप सरकारचं पितळ उघड, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा आला समोर; जाणून धक्काच बसेल