विरोधकांवर खापर फोडतात, तर गेली 10 वर्षे सरकार हजामती करत आहे काय? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

विरोधकांवर खापर फोडतात, तर गेली 10 वर्षे सरकार हजामती करत आहे काय? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

मुंबईत सोमवारी झालेल्या पावसात मुंबई बुडाली होती. मेट्रो रेल्वे स्थानक पाण्याखाली गेले होते. या मुंबईच्या दूरवस्थेला भाजप आणि मिंधे यांनी केलेला भ्रष्टाचारच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी मेट्रो कामात झालेल्या निविदा घोटाळ्यांची माहितीही दिली. तसेच ही कामे केलेल्या संबिधतांवर कारवाई करण्याची गरजही संजय राऊत यांनी केली.

श्रेयवादाच्या लढाईतून घाईघाईने कामची उद्घाटने करण्यात येतात. त्यानंतर अशी परिस्थिती ओढवते. पहिल्याच पावसात मेट्रो बुडाल्याबाबत संबंधितांचा राजीनामा घेण्याची गरज आहे. श्रेयवादासाठी घाईघाईने कामे उकरून उद्घाटने केली जातात, त्यानंतर ते कोसळले की विरोधकांवर खापर फोडून मोकळे होतात. देशात काही घडले की, पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी यांची नावे घेतात. गेली 10 वर्षे ते काय हजामती करत आहेत? देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, सरंक्षण मंत्री काय करत आहेत? असा सवालही त्यांनी केला.

राज्यात कोणाची सत्ता आहे, ते काय काम करत आहेत, त्यांची फक्त खाबूगिरी सुरू आहे. त्यानंतर काही झाले की, उद्धव ठाकरे, अमूक, तमूक यांची नावे घेतात. त्यांना सत्ताधारी म्हणवून घ्यायला लाज वाटली पाहिजे, मुंबई बुडत असताना फडणवीस नांदेडमध्ये अमित शहा यांच्यासोबत राजकारण करत होते. आमच्या कार्यकाळात चुका झाल्याचा आरोप करतात मग साडेतीन वर्षे ते काय करत होते. मेट्रोचे काम कोणी केले, त्यासाठी गुजरातचे सर्व कंत्राटदार होते. आताही मुंबईतील साडेचार हजार कोटींचा कंत्राटे अहमदाबादमधील कंत्राटदारांना देण्यासाठी नियमात बदल करण्यात येत आहेत., याबाबत आपण आणखी माहिती देऊ असे ते म्हणाले. मुंबईतील सत्ता महापालिका अस्तित्त्वात नाही, याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला.

मुंबई मेट्रोच्या कामात त्यांनी दीड हजार कोटींचा टेंडर घोटाळा झाला आहे. या पैशांतून त्यांनी शिवसेना फोडण्याचे आणि नगरसेवक विकत घेण्याचे कारस्थान सुरू आहे. जनतेच्या पैशांतून ही सर्व लूट सुरू आहे. गेल्या चार वर्षात यांनी मुंबईची 35 हजार कोटींची लूट चालवली आहे. या भ्रष्टाचारामुळेच मुंबई बुडाली आहे, असे घणाघातही संजय राऊत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;