समृद्धीवर सुविधांची वानवा, दीडशे किलोमीटरपर्यंत ना पंक्चरचे दुकान ना पेट्रोलपंप ना हॉटेल

समृद्धीवर सुविधांची वानवा, दीडशे किलोमीटरपर्यंत ना पंक्चरचे दुकान ना पेट्रोलपंप ना हॉटेल

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गेल्या तीन दिवसांपूर्वी पार पडले असले तरी या महामार्गावर सेवा आणि सुविधांची मात्र वानवा निर्माण झाली आहे. दीडशे किलोमीटरपर्यंतच्या अंतरात कुठेही पंक्चरचे दुकान, पेट्रोलपंप, हॉटेल आणि स्वच्छतागृह नाही. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या महामार्गावरील रात्रीचा प्रवास जिकिरीचा आणि धोकादायक ठरणार आहे.

मुंबई-नागपूर प्रवास अतिजलद व्हावा यासाठी 701 किलोमीटरचा नवीन समृद्धी महामार्ग अंदाजे 55 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. यां महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा 11 मे 2022 रोजी सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा 26 मे 2023 रोजी सुरू झाला. नंतर भरवीर ते इगतपुरी हा चौथा टप्पा 4 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आला. शेवटचा पाचवा टप्पा इगतपुरी ते आमने (भिवंडी) हा 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला.

या महामार्गावर तब्बल 150 किलोमीटर अंतरात प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. किमान 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर स्वछतागृह, हॉटेल, पेट्रोलपंप, गॅरेज, टायर दुकान असणे गरजेचे होते. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

पाणी, बिस्किटे, फळे जवळ ठेवा
समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना आपली वाहने अपडेट ठेवावी लागणार आहेत. वाहनात पेट्रोल, डिझेल, गॅस व चार्जिंग यांसह गाडीचे टायर अन्य बाबी घेतल्यानंतर या महामार्गावरून प्रवास सुरू करता येणार आहे. आपल्या वाहनात पिण्याचे पाणी, सुकामेवा, बिस्किटे, फळे सोबत घेतल्यानंतरच आपले वाहन समृद्धी महामार्गावर आणावे लागणार आहे. या महामार्गावर सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – घेरा यशवंतगडाच्या कोसळलेल्या कामाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा, माजी आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी Ratnagiri News – घेरा यशवंतगडाच्या कोसळलेल्या कामाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा, माजी आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे, नाटे परिसरातील ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करावी आणि दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम, प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना संधी द्या – शरद पवार
एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आषाढी यात्रेतील गर्दीवर नियंत्रण आणणार, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची माहिती
बीडमध्ये पोलिसाांच्या कार्याला सलाम! शेकडो वृद्धांना पाठीवर घेऊन कथास्थळापर्यंत पोहोचवले
Ratnagiri News – दापोली तालुक्यात केळशी सजाचे तलाठी 20 हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात
तळीरामांच्या खिशाला कात्री! दारुवरील उत्पादन शुल्कात वाढ