गोगावलेंचा आणखी एक कारनामा ; परवानगीविनाच सावित्रीतील गाळ काढण्याचे घाईघाईत उद्घाटन

गोगावलेंचा आणखी एक कारनामा ; परवानगीविनाच सावित्रीतील गाळ काढण्याचे घाईघाईत उद्घाटन

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले मिंधेंचे महाड येथील आमदार भरत गोगावले यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. सावित्री नदी पात्रातून गाळ उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना गोगावले यांनी आज चक्क या गाळ काढण्याच्या कामाचे स्वयंघोषित उद्घाटन केले. याची गंभीर दखल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली आहे. पक्षाचे महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून गोगावलेंवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

मी मंत्री असल्याने मी करीन तीच पूर्व दिशा असा भरत गोगावले यांचा महाडमध्ये कारभार सुरू आहे. महाडमधील सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याचे उद्घाटन आज गोगावले यांनी धावत पळत जाऊन केले. परंतु हा गाळ उपसण्याची कोणतीही शासकीय परवानगी त्यांनी घेतली नसल्याचे उघड झाले. शिवसेनेचे महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी गोगावलेंच्या या कारनाम्याचा पत्रकार परिषद घेऊन भंडाफोड केला. ते म्हणाले, गोगावलेंच्या या गाळ उपसा उद्घाटनाबाबत मी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना विचारले असता त्यांनी गाळ काढण्याच्या कामाच्या मंजुरीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे असे मला स्पष्टपणे सांगितले. याचाच अर्थ कोणतीही वैध शासकीय परवानगी मिळाली नसतानाही मंत्री भरत गोगावले यांनी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून या कामाचे उद्घाटन केले आहे.

लवकरात लवकर कारवाई करा !
याप्रकरणी ओझर्डे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला नाही तर संबंधित मंत्री आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नावे नमूद करून सीआरपीसी कलम 156 (3) अन्वये थेट न्यायालयात अर्ज दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव? लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
    बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा दमदार अभिनय असो किंवा
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत
मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले
श्री विठ्ठल मंदिर परिसरात VIP वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा निर्णय
प्रभागरचनेसाठी पुणे महापालिका घेणार ‘गुगल अर्थ’चा आधार
फक्त गव्हाचे पीठ नाही, तर निरोगी राहण्यासाठी ‘या’ पौष्टिक पिठांचा आहारात समावेश हवाच, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?