Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा

Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा

रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत 25 मे रोजी झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. हा खून महिलेच्या नातेवाईकानेच अनैतिक संबंधांतून केला असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सहा वेगवेगळ्या पथकांनी राज्यभर केलेल्या तपासानंतर मृत महिलेची ओळख पटवून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.

स्वाती केशव सोनवणे (वय – 25, रा. माजलगाव, जि. बीड), स्वराज (वय 3 वर्षे) आणि विराज (वय 1 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर, गोरख पोपट बोखारे (वय – 36, रा. सरदवाडी, शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 25 मे रोजी रांजणगाव परिसरातील खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवून आरोपीला अटक करण्याचे आव्हान होते.

मात्र, ओळख पटविण्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत 28 अंमलदारांची सहा पथके पाठविण्यात आली होती. या पथकांनी प्रत्येक जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली, तेव्हा बीडमधील माजलगाव पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याचे आढळले. मृत महिलेचे वर्णन मृत महिलेशी जुळत होते. पतीकडे चौकशी केल्यावर ती आळंदी येथे आई-वडिलांकडे गेल्याचे समजले. आळंदीत चौकशी केली असता, ती गोरख याच्याबरोबर गेली असल्याची माहिती मिळाली. स्वाती ही आरोपी गोरखच्या चुलत मामाची मुलगी आहे.

स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. हे वाद नेहमी गोरख सोडवत होता. यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. चारच महिन्यांपूर्वी गोरखने त्यांच्यातील वाद मिटवला होता. दरम्यान, स्वाती आळंदीला आल्यावर तिने गोरखकडे विवाहाचा तगादा लावला. यामुळे वाद झाल्यावर गोरख तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना दुचाकीवर घेऊन 23 मे रोजी रात्री खंडाळे गावाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर घेऊन आला. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाले.

देवदर्शनावरून येताना सादळे-मादळे घाटामध्ये पत्नीचा खून, पळून गेलेला पती सोलापूर पोलिसांसमोर हजर; खुनाची दिली कबुली

दरम्यान, दोन्ही मुले झोपली असताना त्याने स्वातीचा गळा आवळला आणि डोक्यात दगड घालून खून केला. त्यावेळी झोपेतून उठलेल्या मुलांचाही गळा आवळून खून केला. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्याने एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणून तिघांच्याही मृतदेहांवर टाकून त्यांना आग लावली व तेथून पळाला. घटनेनंतर नेहमीप्रमाणे तो रांजणगाव येथील एका कंपनीतील गाडीवर चालक म्हणून काम करत राहिला. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करून त्याला ताब्यात घेतले. त्याला शिरूर न्यायालयात हजर केले. ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल
आपण अनेकदा म्हणतो की फळांचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर असते. पण हे 90 टक्के लोकांना माहित नसेल की असेही काही...
झोपताना ही 5 लक्षणे दिसली तर ब्रेन ट्यूमर असू शकतो, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
चुटकीसरशी हवंय स्वच्छ घर? वापरून बघा हे घरगुती क्लिनिंग सोल्यूशन्स!
फफूंदी, किडींपासून गव्हाचे संरक्षण करण्यासाठी आजमवा हे पारंपरिक उपाय…
अंडरआर्म्समध्ये तुरटी लावल्याने काय होते? जाणून थक्क व्हालं
Photo – रिंकू सिंहला ‘क्लीन बोल्ड’ करणाऱ्या खासदार प्रिया सरोज यांना सारखरपुड्यात अश्रू अनावर
किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, स्वराज्याच्या राजधानीत शिवभक्तीचा जागर