साय-फाय – मलेरियाशी नवा लढा

साय-फाय – मलेरियाशी नवा लढा

>> प्रसाद ताम्हनकर

घातक रोगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मलेरियामुळे जगभरात दरवर्षी सहा लाख लोक मरण पावतात. या मृतांमध्ये बालकांचा सर्वात जास्त सहभाग असतो. जगभरातील शास्त्रज्ञ या रोगाशी झुंजण्यासाठी सतत झटत असतात. नवनव्या प्रयोगांनी पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी असा उपाय शोधत असतात. आनोफिलिस मादी डासाच्या चाव्यामुळे मलेरिया रोगाचे प्लाझमोडीयम वायवॅक्स नावाचे परजीवी आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि हा आजार पसरवतात. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छरदाणी, काही कीटकनाशके असे उपाय आतापर्यंत राबवले जात होते. मात्र संशोधकांनी आता कीटकनाशकांचा वापर करून रोगाला आळा घालण्याच्या ऐवजी या मादी डासांच्या आत असलेल्या परजीवीला लक्ष करण्याचे ठरविले आहे.

हार्वर्ड विद्यापीठाने या परजीवींपासून डासांना मुक्त करणारी दोन प्रभावी औषधे शोधून काढली आहेत. मच्छरदाणीला आतून आणि बाहेरून असे या औषधाचे लेपन करण्यात येते व त्याचा प्रभावी उपयोग होत असल्याचेदेखील समोर आले आहे. मलेरियापासून बचावासाठी मच्छरदाणी वापरणे किंवा लहान मुलांना संरक्षणासाठी लस देणे, अधिक तीव्रतेच्या भागात मच्छरदाणीवर कीटकनाशके शिंपडणे असे उपाय राबवण्यात येत असतात. मात्र अनेक देशांत आता डास या कीटकनाशकांना दाद देत नसल्याचे समोर आल्याने संशोधक चिंताग्रस्त झाले होते. यावर उपाय म्हणून त्यांनी आता थेट परजीवींवर हल्ला करण्याचे निश्चित केले आहे.

यापूर्वी आम्ही डासांना मारण्याचे नवनवे उपाय शोधत होतो. मात्र आता आम्ही काही वेगळे करून बघण्याचे ठरविले आहे असे हार्वर्डच्या संशोधकांनी सांगितले. पूर्वीचे उपाय आता तेवढे असरदार ठरत नसल्याचेदेखील संशोधकांच्या लक्षात आले आहे. डासांवर औषधाचा वापर करण्यापूर्वी मलेरियाच्या अ  मध्ये असलेल्या कमकुवत बिंदूंचा शोध संशोधक घेत आहेत. परजीवींना लक्ष्य करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची एक यादी बनवण्यात आली आणि त्यातून 22 प्रभावी अशा औषधांची निवड करण्यात आली. त्यानंतर मलेरियाचे परजीवी असणाऱ्या मादी डासांवर त्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांमधून संशोधकांना दोन सर्वात प्रभावी अशी औषधे मिळाली, जी परजीवींचा पूर्ण नाश करतात.

नेचर ता मासिकात या संशोधनाची माहिती देण्यात आलेली आहे. संशोधकांनी या औषधाची फवारणी मच्छरदाणीवर केली. या मच्छरदाणीच्या संपर्कात आलेले डास जिवंत जरी राहिले तरी त्यांच्यातील परजीवी पूर्णपणे नष्ट होतात आणि त्यामुळे असे डास पुढे मलेरियाचा प्रसार करू शकत नाहीत. `अद्वितीय’ अशा शब्दात या औषधांचे कौतुक करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे काही देशांत आता तिथले डास कीटकनाशकांना सरावले आहेत आणि त्यांच्यात कीटकनाशकांच्या प्रतिरोधाची शक्ती तयार झाली आहे, तशी शक्ती या औषधांच्या विरोधात परजीवींमध्ये तयार होण्याची शक्यता नाही हे या औषधांचे सर्वात मोठे यश आहे. ही औषधे मच्छरदाणीवर फवारल्यानंतर त्यांचा प्रभाव मच्छरदाणीवर वर्षभर टिकतो. महागडी कीटकनाशके, त्यांचा कमी होत चाललेला प्रभाव यांना या औषधांमुळे एक स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय मिळाला आहे.

प्रयोगशाळेत या प्रयोगाला मिळालेल्या मोठय़ा यशानंतर आता हा प्रयोग प्रत्यक्षात किती यशस्वी होतो याची चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी इथोपिया या देशाची निवड करण्यात आली आहे. या प्रयोगाच्या सर्व चाचण्या, त्यांचे परिणाम यांचा अभ्यास करून त्यांचा प्रभाव निश्चित करण्यासाठी सहा वर्षे लागतील असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे ही औषधे प्रभावी असली तरी सध्या संशोधक ही औषधे आणि कीटकनाशके अशा दोन्ही पर्यायांचा एकत्र वापर करण्यास सुचवत आहेत. मलेरिया रोगावर औषधी उपचार आज शक्य असले तरी अनेक दुर्गम भागांत ते मिळण्याची व्यवस्था नाही किंवा त्यांची किंमत सामान्य रुग्णाला परवडणारी नाही. जगभरात वाढत चाललेल्या मलेरियावरील औषधांच्या मागणीचा फायदा घेऊन अशा प्रभावित देशांमध्ये बनावट औषधांचा सुळसुळाट माजलेला आणि त्यामुळे काही रुग्णांचे दुर्दैवी मृत्यूदेखील होत आहेत. अशा वेळी हे औषध लवकरात लवकर सामान्य रुग्णापर्यंत पोहोचावे अशीच जगभरातील संशोधकांची इच्छा आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपने हायजॅक केली, चोरली, लुटली. राहुल गांधी सातत्याने हे सांगत आहेत आणि आम्हीही बोलतोय. महाराष्ट्रात भाजप आणि...
‘एचएसआरपी’ ला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद; 30 जून शेवटची तारीख, 16 जूनपासून इतर कामांना ब्रेक
Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’, रिंकू सिंहच्या साखरपुड्याचा मेन्यू व्हायरल
सर्जा-राजाच्या जोडीला लाखाचा भाव; वय कमी अन् ताकद जास्त
नितेश राणेंसारख्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी समज द्या – आमदार नायकवडी
Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून
Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा